नागपूर विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. नागपूरच्या हिंगणा नगरपंचायतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 6 नगरसेवक अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. हे सर्व नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची आणि भाजपचा हात धरल्याची जोरदार कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे, (Congress) यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.नागपूर विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी एकत्र निवडणूक लढत असून काँग्रेसचे नेते अतुल लोंढे हे मविआचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून राजीव पोतदार यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. (Congress) त्यामुळे ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची झाली आहे.

शरद पवार अन् काँग्रेसला मोठा धक्का; 15 बडे नेते शिंदेसेनेत प्रवेश करणार; राज्यात टायगर एक्स्प्रेस सुसाटनागपूर जजिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे एकूण 19 नगरसेवकांचे संख्याबळ मतदार आहे. मविआच्या विजयासाठी ही मते अत्यंत निर्णायक मानली जात आहेत. मात्र या 19 पैकी हिंगण्याचे 6 नगरसेवक अचानक गायब आणि नॉट रिचेबल झाल्याने महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठी फटाफूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हे ६ नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा जर खरी ठरली, तर याचा थेट फटका महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल लोंढे यांना बसू शकतो, (Congress) तर भाजपचे उमेदवार राजीव पोतदार यांचे पारडे जड होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
पाऊस लांबल्यामुळे वाढली पाणीटंचाईची धग