आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत मेन्स टीम इंडियाने (opportunity) सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात बुधवारी 18 फेब्रुवारीला नेदरलँड्सवर मात केली. टीम इंडियाने यासह साखळी फेरीत सलग चौथा विजय मिळवला. आता टीम इंडिया काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सुपर 8 फेरीसाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात या दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. भारतीय महिला संघाने 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयी सलामी दिली.(opportunity) त्यामुळे भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याची संधी होती. मात्र यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये (opportunity) झालेल्या सामन्यात 19 धावांनी मात केली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 164 धावांचं आव्हान ठेवलं होतं. महिला ब्रिगेडला प्रत्युत्तरात 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 144 धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह दुहेरी कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने मालिकेत विजयाचं खातं उघडलं. तसेच ऑस्ट्रेलियाने मालिकेत आव्हान कायम राखत 1-1 ने बरोबरी साधली. आता उभयसंघातील तिसरा, निर्णायक आणि अंतिम सामना हा शनिवारी 21 फेब्रुवारीला होणार आहे.
हेही वाचा :
महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!
मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली