अलर्ट! राज्यातील 23 जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपलं

राज्यातील अनेक जिल्ह्यांना काल रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने(rains) जबरदस्त तडाखा दिला. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील 23 जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस बरसला. अनेक भागांत झाडं उन्मळून पडली, विजांच्या कडकडाटासह जनावरे आणि माणसांच्या मृत्यूच्या घटनाही समोर आल्या आहेत.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जाफराबाद तालुक्यात वीज पडून एका गाईचा मृत्यू झाला, तर राजुर परिसरात दोन बैल आणि एक गाय मृत्यूमुखी पडली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

सुमारे एक तासाच्या मुसळधार पावसाने(rains) पुणे विमानतळ परिसरात पाणी साचले. अमरावती जिल्ह्यातील सात तालुक्यांना पावसाचा मोठा फटका बसला. विजेच्या जोरदार लाटांमुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. काही शहरांमध्ये आठ ते दहा तास वीज गायब होती.

जालना जिल्ह्यातील बेलोरा गावात वीज पडून गाईचा मृत्यू झाला. डोणगाव येथे तीन जनावरांचा अंत झाला. अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यांपुढे अंधार केला आहे. फळबागांमध्ये पडणाऱ्या पावसामुळे उत्पन्नावरही परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजपासून पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिकसाठी २२ व २३ मे रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई वेधशाळेने १९ ते २५ मे या कालावधीत राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मनमाड रेल्वे स्टेशनवर पावसामुळे गळती झाल्याचे चित्र दिसून आले आहे. जळगाव जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

हेही वाचा :

त्यावेळी नरेंद्र मोदींनाच भाजपातून काढण्याच निर्णय झाला…; बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

मार्केट गाजवण्यासाठी Honda Rebel 500 झाली लाँच

सांगलीतील विवाहितेने शारीरिक, मानसिक छळ केल्याने संपवले जीवन; माहेरहून पैसे आण अन्..