मथुरा (उत्तर प्रदेश): तरुणीला रात्री कुठे ठेवायचं, यावरून प्रियकर, त्याचा मित्र आणि प्रेयसीमध्ये(girlfriend) झालेल्या वादाचे टोक इतके भयंकर झाले, की प्रियकराने थेट शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मथुरामधील बरसाना पोलीस ठाणे क्षेत्रात घडली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तरुणाची प्रेयसी आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?
मृत तरुणाचं नाव अमन असून तो हरियाणातील तावडू-नूंह येथील रहिवासी होता. अमन आणि त्याचा मित्र मोटारसायकलवरून आपल्या प्रेयसीला(girlfriend) भेटण्यासाठी मथुराच्या गावाबाहेर घेऊन गेले होते. मात्र, रात्री १२ वाजता मोटारसायकल बंद पडल्याने तिघेही अडचणीत आले.
त्या वेळी, “तरुणीला आता कुठे ठेवायचं?” या प्रश्नावरून तिघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद इतका चिघळला की अमन रागात त्या ठिकाणाहून निघून गेला. काही वेळातच त्याने शेतात जाऊन झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

प्रेयसी व मित्र झाले फरार, मृतदेह दोन दिवसांनी सापडला
घटनेनंतर प्रेयसी आणि तिचा मित्र घटनास्थळावरून फरार झाले. २ दिवसांनंतर गाजीपूर आणि संकेत गावादरम्यान अमनचा मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळून येताच बरसाना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.
प्रेयसी व मित्राच्या अटकेने नवीन वळण
तपासादरम्यान, अमनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी प्रेयसी आणि तिच्या मित्राला अटक केली. सद्यस्थितीत त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
गावात खळबळ
ही घटना समजताच परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे. अमनच्या आत्महत्येमुळे एक तरुण आयुष्यातून हरपला असून, एका प्रेमसंबंधात निर्माण झालेला क्षुल्लक वाद इतका भयावह वळण घेईल, यावर कोणीही विश्वास ठेवू शकले नाही.
हेही वाचा :
राज्याला पुढील २४ तास अत्यंत धोक्याचे; ‘या’ जिल्ह्यांत वरूणराजा कहर करणार
टीम इंडियाचा क्रिकेटपटू , लग्नानंतर 6 वर्षांनी झाला बाबा, पत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म
Love Marriage असो वा अरेंज मॅरेज, का तुटत आहेत नाती? प्रेमानंद महाराजांनी दिले मोठे कारण