इचलकरंजी – शहरातील नामवंत समजल्या जाणाऱ्या(registered) श्रद्धा अकॅडमी मधील एका बारावीच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी संतप्त जमावाने काल सायंकाळी अकॅडमीवर दगडफेक करत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सदर तोडफोड प्रकरणी १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गावभाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीसांनी स्वतः फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे. यावेळी अकॅडमी बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले आहेत.

सदर विद्यार्थी बारावीत शिकत होता (registered)व काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे. मात्र, मृत्यूच्या कारणांबाबत अजूनही स्पष्टता नसून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.या घटनेनंतर पालकवर्ग आणि स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी योग्य चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.संपूर्ण घटनेची(registered) चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू असून, तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा :
छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणींनी दाखवले तारे; लाथ मारली अन्…, Video Viral
बॉयफ्रेंड की मित्र? गर्लफ्रेंड रात्री कुणासोबत थांबणार? वाद टोकाला गेला अन्..मध्यरात्री नको ते घडलं
Love Marriage असो वा अरेंज मॅरेज, का तुटत आहेत नाती? प्रेमानंद महाराजांनी दिले मोठे कारण