मुंबई : विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजप-युती सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून, या मतचोरीची चौकशी केली जात नाही. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली असून, लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे. म्हणून प्रदेश काँग्रेस(Congress ) गुरुवारी राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करणार आहे.
तसेच विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीमधील आंदोलनात सहभागी होत आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील आंदोलनात पक्षाचे नेते सहभागी होतील.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले व भाजप-युतीचे पानीपत झाले होते. विधानसभा निवडणुकीत युती १०० जागाही जिंकू शकणार नाही, अशी परिस्थिती असताना भाजप-युतीला प्रचंड बहुमताचा निकाल आला तो अविश्वसनीय आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्केवारवरही संशय निर्माण झालेला आहे.
दरम्यान, मतदान संपल्यानंतर ५८ टक्के जाहीर केलेले मतदार दुसऱ्या दिवशी मात्र ६६.५ टक्के दाखवून तब्बल ७.८३ टक्क्यांची वाढ दाखवली. हा एक मोठा घोटाळा आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष निवडणुका घेणे त्यांचे कर्तव्यच आहे. पण त्यांच्यावरच संशयाचे ढग जमा होत असतील, तर ते लोकशाहीसाठी घातक आहे. निवडणूक आयोगावर निर्माण झालेले हे संशयाचे ढग दूर करण्यासाठी चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने(Congress ) केली.
हेही वाचा :