पित्त वाढल्यामुळे छातीत सतत जळजळ होते? आठवड्यातून एकदा ‘या’ फळांचे सेवन केल्यास कधीच वाढणार नाही अ‍ॅसिडिटी

शरीरात वाढलेली अ‍ॅसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी सतत गोळ्या(acidity) औषधांचे सेवन करण्याऐवजी आहारात बदल करावा. दैनंदिन आहारात फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यासोबतच अ‍ॅसिडिटी नियंत्रणात राहते.

अ‍ॅसिडिटी होण्याची प्रमुख कारणे?
अ‍ॅसिडिटी झाल्यानंतर कोणत्या फळांचे सेवन करावे?
छातीत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आहारात सतत काहींना काही बदल (acidity)होत असतात. घाईगडबडीच्या दिवशी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. ज्यामुळे अ‍ॅसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. नियमित तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात पित्त वाढू लागते. शरीरात पित्ताचे प्रमाण वाढल्यानंतर अ‍ॅसिडिटी होणे, आंबट ढेकर येणे, सतत मळमळ किंवा उलटी झाल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक समस्या शरीरात दिसून येतात. त्यामुळे आहारात कायमच कमी तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करावे. अपुऱ्या झोपेचा परिणाम शरीराच्या पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे गॅस होणे, पोट फुगणे, अ‍ॅसिडिटी, थकवा इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात.

बऱ्याचदा अ‍ॅसिडिटी वाढल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधाचे सेवन करतात. पण वारंवार गोळ्या औषधाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. सतत औषध खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या सेवनामुळे शरीर कायमच निरोगी राहते आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते. शरीरात वाढलेली अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचे सेवन करावे.

अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी घरगुती उपाय:
पपई:
दैनंदिन आहारात नियमित पपईचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली (acidity)अ‍ॅसिडिटी नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय पपईमध्ये असलेले पापेन नावाचे विशेष एन्झाइम शरीराची पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. त्यामुळे आहारात तुम्ही पपईचे सेवन करू शकता. मांस, अंडी, मसूर किंवा चीज इत्यादी पचनासाठी जड असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात अ‍ॅसिडिटीचे प्रमाण वाढू लागते. अशावेळीपपई खाणे फायद्याचे ठरते. पोटात वाढ्लेली जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी पपई खावी.

किवी:
किमतीने महाग असलेले किवी हे फळ चवीला आंबट गोड लागते. पण आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे. किवीमध्ये विटामिन सी आणि अ‍ॅक्टिनिडिन नावाच्या एन्झाइम असते. त्यामुळे जड अन्नपदार्थांचे सेवन केल्यास किवी खावी. यामुळे तुमची पचनक्रिया कायमच निरोगी राहील. पोट फुगणे, गॅस इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी किवी खावी.

अननस:
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं अननस खायला खूप जास्त आवडतो. अननस चवीला अतिशय आंबट असतो. यामध्ये ब्रोमेलेन नावाचे नैसर्गिक एन्झाइम आढळून येते. ज्यामुळे शरीरातील प्रथिनांचे विघटन होऊन पचनक्रिया सुधारते. अननस खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. पण अननसाचे नियमित सेवन केल्यास शरीराला हानी पोहचते.

हेही वाचा :

महिलांनी कधीच करू नयेत या 4 चुका नाहीतर कुटुंबाची लागेल वाट!
महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ धोक्यात! वेरूळच्या लेण्यांमध्ये पाणी गळती; जैन गुहा क्रमांक 32 मध्ये…
प्रत्येकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता; उत्तरकाशीतील दुर्घटनेवर अजित पवारांचे भाष्य