इंग्लंडला विजयानंतर मिळाली अजून एक गुड न्यूज, सामना संपल्यावर नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या..

तिसरा कसोटी सामना कोण जिंकेल, हे कोणालाही कळत नव्हते. पण अखेर इंग्लंडने(match) थरारक विजय साकारला. पण या विजयानंतर आता इंग्लंडच्या संघासाठी अजून एक गुड न्यूज आली आहे.

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना चांगलाच रंगतदार झाला.(match) भारताने अखेरपर्यंच चांगली लढत दिली खरी, पण या सामन्यात अखेर इंग्लंडने बाजी मारली. हा सामना संपला आणि त्यानंतर आता इंग्लंडच्या संघासाठी आनंदाची बातमी आली आहे.

तिसऱ्या कसोटीत एकामागून एक बरेच धक्के बसले. भारतीय संघ या सामन्यात आघाडी घेईल, असे सर्वांना वाटत होते. कारण ऋषभ पंत आणि केएल राहुल यांची चांगली भागीदारी झाली होती. या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात दोन्ही संघाचे समान गुण झाले. त्यामुळे कोणत्याही संघाला आघाडी मिळवता आली नाही. भारतासाठी हा(match) एक मोठा धक्का होता. त्यानंतर इंग्लंडला दुसऱ्या डावात २०० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही, त्यांना १९२ धावा करता आल्या. भारताला विजयासाठी १९३ धावांचे आव्हान देण्यात आले होते. भारत हा सामना सहज जिंकेल, असे सर्वांना वाटत होते. पण भारताला या १९३ धावा करता आल्या नाहीत आणि इंग्लंडला विजय मिळवता आला. इंग्लंडला या विजयासह आता अजून एक गुड न्यूज मिळाली आहे.

भारताविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी क्रिकेट इंग्लंडने विजय मिळवला. त्यामुळे तीनपैकी दोन कसोटी जिंकल्यानंतरही इंग्लंडचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. भारतीय संघ सध्या चौथ्या स्थानी आहे. या सामन्यापूर्वी ही परिस्थिती उलट होती. कारण इंग्लंड चौथ्या स्थाानवर होता, तर भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर विराजमान होता. पण तिसऱ्या कसोटीतील विजयानंतर इंग्लंडला क्रमवारीत बढती मिळाली आहे.

इंग्लंडच्या संघाला झाला दंड..
गुणांचा दंड होण्यापूर्वी इंग्लंडचे गुण २४ होते, तर सरासरी गुण ६६.६७ होते. मात्र, आता त्यांचे २२ गुण आहेत आणि सरासरी गुण ६१.११ झाले आहेत. दोनपैकी एक कसोटी जिंकलेले; तसेच एक अनिर्णित राखलेला श्रीलंका संघ आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.

षटकांची गती न राखल्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना सामना मानधनाच्या दहा टक्के दंड करण्यात आला. त्यापेक्षाही त्यांना दोन गुणांचा दंड सलत असेल. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकाऐवजी ते तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. इंग्लंडने निर्धारित वेळेत दोन षटके पूर्ण केली नाहीत. प्रत्येक षटकासाठी एका गुणाचा दंड होतो; तसेच सामना मानधनातून पाच टक्के रक्कम कापली जाते. पण इंग्लंडला दंड झाला असला तरी ते तिसऱ्या स्थानावर कायम आहेत.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना मोठा धक्का; ‘या’ पक्षासोबत युती

मोठी बातमी! PM धन धान्य कृषी योजनेला कॅबिनेटची मंजुरी; 1.7 कोटी शेतकऱ्यांना होणार लाभ

जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करा, राहुल गांधींची PM मोदींकडे मागणी…