मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’ केल्यानंतर केंद्र सरकारने उत्तर भारतातील विशेषतः भारत-पाकिस्तान सीमेवरील अनेक विमानतळ १० मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात चंडीगड आणि धरमशाला येथील विमानतळांचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) आणि पंजाब किंग्ज यांच्यात ११ मे रोजी होणारी धरमशाला येथील लढत मुंबईत होणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट बोर्डाने दिले आहेत. दरम्यान, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज, गुरुवारी होणाऱ्या लढतीबाबत अनिश्चितता आहे.

‘मुंबई’ आणि ‘पंजाब’ यांच्यात धरमशाला येथे होणारी लढत आता मुंबईत होईल. धरमशाला येथील विमानतळ बंद करण्याचा निर्णय झाल्यामुळे या लढतीचे ठिकाण बदलण्यात आले आहे, असे भारतीय क्रिकेट बोर्डातील सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर ‘पंजाब’ आणि ‘दिल्ली’ यांच्यातील लढतीबाबतही अनिश्चितता आहे. धरमशाला हे भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेजवळ आहे. याबाबत भारतीय क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी आणि केंद्र सरकारच्या आधिकाऱ्यांत चर्चा सुरू आहे. केंद्राने मंजूरी दिल्यानंतरच ही लढत होईल, असेही सुत्रांनी सांगितले.
सामन्याचे ठिकाण बदलल्याने याचा फायदा मुंबई इंडियन्सला(Mumbai Indians) नक्कीच होणार आहे. कारण पलटण त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. मुंबईला मागील सामन्यामध्ये शेवटच्या बॉलवर पराभव स्वीकारावा लागला होता. आता 11 मे रोजी होणाऱ्या या सामन्यात मुंबई घरच्या मैदानावर होत असलेल्या सामन्याचा किती फायदा करून घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यात मुंबई जिंकली तर प्ले-ऑफसाठीची वाट सोपी होणार आहे.
धरमशाला तसेच चंडिगड येथील विमानतळ बंद होण्यापूर्वीच पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ यापूर्वीच धरमशाला येथे दाखल झाले आहेत. त्याचबरोबर अजूनतरी भारतीय क्रिकेट बोर्डाने आयपीएल सामन्याच्या आयोजनाबाबत कोणतीही सूचना केलेली नाही, त्यामुळे हा सामना पूर्वनिश्चित कार्यक्रमानुसारच होईल. असेही हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी सांगितले होते.
मुंबई इंडियन्सची आगामी लढत पंजाब किंग्जविरुद्ध आहे. धरमशाला येथील सामन्यासाठी संघ चंडीगडहून रवाना होतात. त्यामुळे या सामन्याबाबत प्रश्न आहे. मुंबई इंडियन्स संघ हा चंडिगडहून धरमशालास रस्त्यामार्गे प्रवास करू शकतो. मात्र चंडिगड विमानतळही बंद आहे. चंडीगड – धरमशाला प्रवास सहा तासांचा आहे.

त्याचबरोबर संघ चंडिगडलाही पोहोचणे अवघड आहे. त्याचबरोबर आयपीएलमधील लढतीसाठी केवळ संघातील खेळाडूच प्रवास करीत नाहीत. त्या संघासोबत संघमालक, त्यांचे निमंत्रित आणि काही चाहतेही प्रवास करीत असतात. त्या परिस्थितीत हा प्रवास सोपा नसेल. हा सर्व विचार करूनच ‘मुंबई’- ‘पंजाब’ लढत मुंबईत खेळवण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, मुंबई क्रिकेट संघटनेच्या सुत्रांनीही रविवारी आयपीएलची लढत वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याचे सांगितले.
आयपीएलवर अपेक्षित परिणाम
आज, ८ मे रोजी होणाऱ्या पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्याबाबत संभ्रम
धरमशाला हे भारत-पाकिस्तान सीमेपासून हवाई मार्गे दिडशे किमीपेक्षा कमी अंतरावर
उत्तर भारतात धरमशाला, जयपूर, लखनऊ आणि नवी दिल्ली येथे सामने. त्यातील धरमशाला आणि चंडिगड विमानतळ बंद
लखनऊ – बेंगळुरू (९ मे – लखनऊ), पंजाब – मुंबई (११ मे – धरमशाला), दिल्ली – गुजरात (११ मे – नवी दिल्ली), राजस्थान – पंजाब (१६ मे – जयपूर), या लढती उत्तर भारतात
हेही वाचा :
आज ‘या’ 3 राशींवर असणार बुधादित्य योगाची कृपा; सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
हसत-खेळत वजन होईल कमी, डाएटचीही गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा