भारत चौथ्या स्थानावर तर पाकिस्तान भिकेच्या वाटेवर!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी :

भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचे (place)उद्दिष्ट समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू असताना जपानला मागे टाकत भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनला आहे. नीती आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष व्ही आर सुब्रमण्यम यांनी त्याबद्दलची घोषणा केली आहे. अमेरिका चीन आणि कुरापतखोर, हातात भिकेचा कटोरा घेऊन फिरणाऱ्या पाकिस्तानला हा भारताने दिलेला सूचक इशारा आहे.कोणत्याही परकीय मदतीशिवाय भारत हा आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर झाला आहे. आर्थिक दृष्ट्या आपण भारताच्या जवळपासही फिरू शकत नाही याबद्दल वास्तविक पाकच्या राज्यकर्त्यांनी आत्मचिंतन केले पाहिजे.वारंवार व्यापार युद्धाची भीती घालणाऱ्या अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांनाही आता भारताला गृहीत धरता येणार नाही.दहशतवादी संघटनांना लष्कराचा एक भाग बनवून त्यांच्या माध्यमातून सतत अतिरेकी कारवाया करून भारताला अस्थिर बनवण्याचा, भारताची प्रगती रोखण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सातत्याने करण्यात आला आणि आजही तो केला जातो आहे.

पण दहशतवाद्यांच्या नांग्या वेळोवेळी ठेचून भारताने सर्वांगीण विकासाकडे पुरेपूर लक्ष दिले. देशभर आया भूत भक्कम सुविधा निर्माण केल्या. राष्ट्रीय महामार्ग भक्कम केले, त्यांचे देशभर जाळे विणले, इंधन आणि वेळेचा आपल्यावेळी मोठ्या प्रमाणावर टाळला. देश गतिमान केला. महामार्ग हे खऱ्या अर्थाने प्रगतीचे महामार्ग बनतात. किंबहुना भारताची समृद्धी महामार्गातूनच आली आहे आणि येते आहे. अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी हे नेहमी म्हणत असत की, अमेरिका श्रीमंत आहे म्हणून महामार्ग चांगले आहेत असे नाही तर महामार्ग चांगले आहेत (place)म्हणून अमेरिका श्रीमंत आहे.आज भारत जगातील चौथी आर्थिक महासत्ता बनला आहे त्याचे श्रेय देशातील रस्ते बांधणीला दिले गेले पाहिजे. आर्थिक महासत्ता बनण्यासाठी जे मापदंड ठरवले गेले आहेत त्या सर्व मापदंडापर्यंत देश पोहोचला आहे, पोहोचण्याचा

आणखी जास्तीचा प्रयत्न भारताकडून सुरू आहे. जगातील तिसरी आर्थिक महासत्ता बनवण्याचा भारताने निर्धार केला होता आणि त्यासाठी जे प्रयत्न केले आणि म्हणूनच भारत चौथ्या स्थानापर्यंत पोहोचला आहे आणि आता भारताची वाटचाल तिसऱ्या क्रमांकाकडे सुरू झाली आहे.जगभरात अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे, युद्ध सदृश्य स्थिती आहे, जगाची वाटचाल तिसऱ्या महायुद्धाकडे सुरू आहे की काय अशी एकूण स्थिती असताना, जगावर मंदीचे सावटही आले आहे. याच दरम्यान “तुघलकी”मनोवृत्तीच्या डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ कार्ड काढले असून अनेक देशांना व्यापार युद्धाची धमकी दिली आहे. भारताची आर्थिक महासत्तेकडे सुरू (place)असलेली वाटचाल ट्रम्प महाशयांना बोचते आहे. आणि म्हणूनच ॲपल, सॅमसंग या कंपन्यांना त्यांनी भारतातील उद्योग बंद करून अमेरिकेत यावे अशी ते धमकी देऊ लागले आहेत. अमेरिकेला, चीनला भारताला आर्थिक महासत्ता होण्यापासून दूर ठेवावयाचे आहे.

शेजारच्या पाकिस्तान आणि बांगलादेशाला भारताने आर्थिक महासत्ता होणे परवडणारे नाही आणि म्हणूनच त्यांनाही भारताच्या प्रगतीत अडथळे आणावयाचे आहेत. तसे त्यांनी उद्योगही सुरू ठेवले आहेत पण भारताने जशास तसे उत्तर दिले आहे आणि भविष्यातही आमचे हेच धोरण राहणार आहे असे स्पष्ट करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.दहशतवादी संघटनांच्या दहशतवादी कृत्यांना ठेचून काढताना भारताने आर्थिक महासत्ता बनवण्याच्या प्रयत्नांना खिळ बसू दिलेली नाही, आणि म्हणूनच भारत हा जपान सारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थेला मागे टाकत जागतिक पटलावर चौथी आर्थिक महासत्ता म्हणून पुढे आला आहे.
शांततामय वातावरण असेल तर उद्दिष्टे पूर्ण करता येतात, हे भारताने सिद्ध करून दाखवले आहे. शेजारच्या पाकिस्तानने शांततेचा मार्ग धरला तर तो देश आहे आर्थिक अडचणीतून बाहेर येऊ शकतो. तथापि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या, जागतिक बँकेच्या आर्थिक सहाय्यावर जगत असलेला हा देश आहे.

घेतलेली कर्जे खेळता येत नसतानाही पाकिस्तानने अनेक देशांकडून आपल्या कटोऱ्यात मदतीची भिक घेतली आहे. पाकिस्तानला आर्थिक दृष्ट्या मदत करण्यात अमेरिकेसह काही प्रमुख राष्ट्रांचे हेतू वेगळे आहेत. चीनची पाकिस्तानातील गुंतवणूक हा आशियाई खंडातील राजकारणाचाच एक भाग आहे. पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताला कायम युद्ध सज्ज ठेवायचे. युद्धसद्धतेवरचा भारताचा खर्च वाढवायचा आणि भारताची आर्थिक प्रगती रोखायची अशा प्रकारचे नियोजन या देशाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे मात्र त्यांच्या या नियोजन पूर्वक प्रयत्नाला भारताने यशस्वी होऊ दिलेले नाही. त्याचाच परिपाक म्हणजे भारताने चौथी आर्थिक महासत्ता बनने होय.

हेही वाचा :

वैष्णवी हगवणे प्रकरण भोवले! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील

हॉटेलमधून चेक आउट करताना रुममधील ‘या’ 5 वस्तू घरी घेऊन जाऊ शकता