तुमचा पार्टनर तुम्हाला फसवतोय का?; ‘या’ ३ लक्षणांवरून ओळखा

बेवफाई हा एक अत्यंत वेदनादायी अनुभव असतो आणि प्रेम तसेच वैवाहिक (Identify)जीवनातील सर्वात कठीण परिस्थितींपैकी एक असतो. आपल्या जोडीदाराने किंवा प्रिय व्यक्तीने दिलेला धोका अनेकदा लोकांच्या मनात आयुष्यभर दुःख निर्माण करतो. प्रेम जितके जास्त गहिरे असते, तितकीच त्यातील बेफवाईची जखम खोलवर आणि तीव्र असते. बहुतेक लोकांसाठी या वेदनेतून सावरणे कठीण होते, तर काहीजणांना त्यांच्यासोबत विश्वासघात होत आहे हे लक्षातही येत नाही. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला काही संकेत सांगणार आहोत, जे तुम्हाला धोका आणि बेफवाई ओळखण्यास मदत करू शकतात.

यापैकी कोणतेही एक लक्षण निश्चितपणे तुमचा पार्टनर तुम्हाला शंभर टक्के धोका देत आहे हे सांगू शकत नाही. पण वर्तणुकीतील बदल,(Identify) विचित्र हालचाली आणि संशयास्पद घटना एकत्र आल्यास तुम्हाला परिस्थितीबद्दल सतर्क राहण्यास आणि स्वतःचा बचाव करण्यास मदत करू शकतात.

  1. बोलण्यात बदल:
    पार्टनर किंवा वैवाहिक नात्यात संवादाची कमतरता कधीही चांगली गोष्ट नसते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलू शकत नसाल, त्यांच्यासोबत तुमचा दिवस घालवू शकत नसाल किंवा तुमच्या भावना व्यक्त करू शकत नसाल, तर तुमच्या नात्यात समस्या निर्माण झाली आहे.(Identify) संवाद कमी झाल्यास तुमच्यातील अंतर वाढत जाते, त्यामुळे वेळेत यावर तोडगा काढणे महत्त्वाचे आहे.
  2. वागण्यात बदल:
    तुमच्या जोडीदाराला कामाचा ताण किंवा कुटुंबातील इतर समस्या असू शकतात, ज्यामुळे त्यांच्या वागण्यात बदल होऊ शकतो. पण जर तुमच्या पार्टनरने तुमच्या आवडीनिवडी किंवा तुमच्या आत्म-सन्मानाची पर्वा करणे सोडले असेल, तर ते योग्य नाही. याशिवाय, जर तुमचा जोडीदार तुमच्याबद्दल जास्त टीकात्मक झाला असेल आणि तुमच्याशी वारंवार भांडण करत असेल, तर हे धोक्याचे लक्षण आहे.
  3. रुची कमी होणे:
    जेव्हा एखादी स्त्री किंवा पुरुष प्रेमात असतात, तेव्हा ते आपल्या पार्टनरच्या अगदी लहान गोष्टींचीही काळजी घेतात. वेळेनुसार परिस्थितीत बदल होत असला तरी, जर तुमचा जोडीदार तुमच्याबद्दल उदासीन झाला असेल, तर याचा अर्थ असा होऊ शकतो की त्यांची तुमच्यातील रुची कमी झाली आहे. पार्टनरचे एकटे राहणे, वेगळ्या खोलीत झोपणे, मुले आणि पार्टनरपासून दूर राहणे किंवा घराबाहेर जास्त वेळ घालवणे हे नात्यातील समस्यांचे संकेत असू शकतात.

हेही वाचा :

ब्रेकिंग! जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक

कोल्हापूरच्या हद्दवाढी शिवाय को.म.न.पा. निवडणूक होणार

रेशनकार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक, राज्यात 18 लाख रेशन कार्ड रद्द