इचलकरंजीच्या पाणीटंचाईवर तोडगा, सुळकूड पाणी योजना तातडीने कार्यान्वित करा – खासदार धैर्यशील माने यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

इचलकरंजी शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मंजूर करण्यात आलेली (shortage)सुळकूड पाणी पुरवठा योजना तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस इचलकरंजीत आले असता खा. माने यांनी त्यांना भेटून यासंदर्भात निवेदन सादर केले. इचलकरंजी शहराची लोकसंख्या सुमारे ३.५० लाख इतकी असून, सध्या फक्त ४५ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे. परिणामी, शहरात दर २-३ दिवसाआड पाणी मिळत आहे.(shortage) प्रत्यक्षात शहराला ८९ एमएलडी पाण्याची गरज आहे.

ही गरज लक्षात घेऊन शासनाने दुधगंगा (shortage)नदीवरून सुळकूड येथे जलउगम निश्चित करून १६० कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी १ मार्च २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत कृती समितीची स्थापना करून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सदर अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शहरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ही योजना तातडीने राबवावी, अशी मागणी खा. माने यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार राहुल आवाडे हे देखील उपस्थित होते.

हेही वाचा :

अभिनेत्रीने बॉलिवूडला ठोकला रामराम चाहत्यांना धक्का..!

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

काही विवाह भयानक असतात… Video Viral