सर्वच राजकिय पक्षांकडून महापालिका स्वबळावर?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी :

एकीकडे बिगर मोसमी पावसाने वातावरण नरम झालेले असताना (political)कोल्हापूरचे राजकीय वातावरण मात्र गरम होत चालले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे त्यासाठीचे निमित्त ठरले आहे. महापालिकेच्या सत्ताकारणात एकाकी पडलेल्या काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्यासमोर त्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांची गळती थांबवण्याचे आव्हान आहे. चौरंगी सदस्य प्रभाग पद्धती असल्याने महायुती, महाविकास आघाडी यांच्याकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवली जाण्याची शक्यता आहे आणि आघाडीतील प्रत्येक घटक पक्षांला त्यांचा महापौर अपेक्षित आहे. पहिल्यांदाच पॅनल सिस्टीम ने होणारी ही निवडणूक प्रत्येक उमेदवाराला आर्थिक दृष्ट्या महागाची ठरणार आहे.

सध्या या महापालिकेत म्हणजे विसर्जित सभागृहात काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी काँग्रेसचे 14, भाजप 14, महाडिक प्रणित ताराराणी आघाडी 19 आणि शिवसेना चार असे संख्या बळ होते. काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. एकूणच या महापालिकेवर सतेज पाटील यांचे प्रभुत्व होते. (political)त्यांचे हे प्रभुत्व कमी करण्याचे किंवा त्यांना महापालिकेच्या सत्ता करण्यापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न महायुतीकडून विशेषता एकनाथ शिंदे शिवसेनेकडून सुरू आहेत. त्यासाठीच त्यांचे विश्वासू कार्यकर्ते फोडण्याचे राजकारण सध्या सुरू आहे. शारंगधर देशमुख हे सत्यजित पाटील यांचे उजवे हात समजले जात होते पण तेच आता शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सतेज पाटील यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी दिली होती. याशिवाय अन्य काही जिल्ह्यात सतेज पाटील हे राजकीय दृष्ट्या व्यस्त होते.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्याकडून तसेच दुर्लक्ष झाले. त्यांचे हे दुर्लक्ष समजू शकते पण त्यांनी निर्णय(political) घेताना जवळच्या कार्यकर्त्यांना सुद्धा गृहीत धरले होते आणि हीच त्यांची चूक झाली. आता तर त्यांची “राजकारणात कठीण काळात, कामास कोण येतो”

नेता सत्तेच्या परिघा बाहेर गेला, नेता जिंकण्याची लढाई हरला, तर त्याच्याभोवती असलेली लाभार्थ्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागते. नेता हा कार्यकर्त्यांना गृहीत धरून राजकीय निर्णय घेऊ लागला की, जवळचे कार्यकर्ते वर्तुळ सोडायला लागतात. सध्या याच अनुभवातून जात असलेल्या सतेज पाटील यांना कोल्हापूर महापालिका हा सत्तेचा गड जिंकावयाचा आहे. पण त्यासाठी स्वतःची राजकीय सुरक्षा प्रणाली भक्कम ठेवून प्रबळ विरोधकांचे महत्त्वकांक्षेचे ड्रोन पाडण्याचे कौशल्य दाखवावे लागणार आहे. हे काम बदललेल्या राजाकीय समीकरण यामुळे सहज आणि सोपे राहिलेले नाही. यावेळी त्यांच्याकडे भरवशाचे मित्र नाहीत आणि जे नवे राजकीय मित्र लाभले आहेत ते आधीच शक्तीहीन झालेले आहेत.

तीन-चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांना स्वतःच्या काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणता आलेले नाहीत. कोल्हापूर महापालिका हद्दीतील कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण हे दोन्ही मतदार संघ काँग्रेसने गमावले आहेत. कोल्हापूर उत्तर मधून त्यांनी काँग्रेसमध्ये नव्यानेच आलेल्या राजेश लाटकर यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर केल्यानंतर कोल्हापूर दक्षिणचा (political)गड सांभाळणारे शारंगधर देशमुख यांच्यासह काही वजनदार माजी नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकवले होते. सतेज पाटील यांचा विधानसभेचा हा राजकीय निर्णय फसला. माजी आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी त्यांची साथ सोडली. स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या कुटुंबीयांनी त्यांची साथ सोडली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. एकूणच सतेज पाटील गटाची पडझड झाली. या प्रतिकूल राजकीय वातावरणात त्यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.


प्रशासक राज येण्यापूर्वी कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसचे संख्याबळ सर्वाधिक होते. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचे महापालिकेत नेतृत्व होते. महाविकास आघाडी सत्तेत होती तोपर्यंत ठीक होते पण महाविकास आघाडी सत्तेतून उतरल्यानंतर, अजित दादा हे भाजपच्या बरोबर गेल्यानंतर समीकरण बदलली. काल सत्तेत सतेज पाटील आणि मुश्रीफ दोघेही होते. आज मात्र फक्त मुस्लिम सत्तेत आहेत. त्यामुळे हे दोघेही आता एकमेकांचे कट्टर विरोधक बनले आहेत. सत्यजित पाटील आणि हसन मुश्रीफ या दोघांचेही या निवडणुकीत मित्र बदलले आहेत आणि या दोघांनाही निवडणूक जिंकावयाची आहे.


कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होणार असली तरी, वास्तवात महाडिक आणि सतेज पाटील या पारंपरिक राजकीय शत्रूमध्ये निकराची लढाई होणार आहे. लोकसभा निवडणुकीत जे घडले ते विधानसभा निवडणुकीत घडलेले नाही आणि विधानसभा निवडणुकीत जे घडले ते महापालिका निवडणुकीत घडेलच असे कोणीही खात्रीपूर्वक सांगू शकणार नाही.


कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदार संघाचा बहुतांशी भाग हा शहरात येतो आणि कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे 28 प्रभाग येतात. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही मतदार संघात भाजप आणि शिंदे गट यांचे उमेदवार विजयी झालेले आहेत. त्यामुळे स्थूल मानाने कोल्हापुरात महायुतीचा प्रभाव असल्याचे मानले जाते. पण कोल्हापूर महापालिकेची निवडणूक जिंकण्याची संपूर्ण जबाबदारी महाडिक गटाकडे असणार आहे. कोल्हापूर महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे एक दोन उमेदवार निवडून येताना त्यांना नाकी नव येत असे. नंतर मात्र भाजपाचे चंद्रकांत दादा पाटील यांनी महाडिक यांच्या ताराराणी आघाडीशी युती करून भाजपची या शहरात हवा तयार केली. प्रशासक राज येण्यापूर्वी या महापालिकेत भारतीय जनता पक्ष हा प्रबळ विरोधी पक्ष होता.

कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणात काही वजनदार नगरसेवकांची सतेज पाटील यांना साथ होती. आता मात्र काही प्रमुख कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांचा”हात”सोडला आहे. ही मंडळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी इच्छुक आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जो नेता इच्छुकांशी अर्थपूर्ण तडजोडी करणार आहे, त्या नेत्याची हवा असणार आहे. महादेवराव महाडिक यांची या महापालिकेत सत्ता होती तेव्हा ते महापालिका निवडणुकीत प्रभाग निहाय ज्या उमेदवाराची चर्चा आहे, त्या उमेदवाराला आर्थिक रसद पुरवत असत. एकाच मतदारसंघात ते दोघा दोघा जणांना भरीव अर्थ सहाय्य करत असत. आता हाच महादेव महाडिक पॅटर्न महायुती आणि महाविकास आघाडीला राबवावा लागणार आहे.

हेही वाचा :

वैष्णवी हगवणे प्रकरण भोवले! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील

हॉटेलमधून चेक आउट करताना रुममधील ‘या’ 5 वस्तू घरी घेऊन जाऊ शकता