अघोषित युद्धात, पाकची हानी! भारत रणनीती बदलणार?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सध्या सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तान(Pakistan) यांच्यातील अघोषित युद्धामध्ये दोन्ही देशांचे नेमके किती नुकसान झाले याची अचूक माहिती मिळत नाही आणि जी माहिती वृत्तवाहिन्यांच्या कडून वृत्तपत्रांमधून मिळते ती वास्तव त्याला धरून आहे असे म्हणता येत नाही. कारण हल्ले आणि प्रतिहल्ले हे लाईव्ह दाखवण्यास केंद्र शासनाकडून मनाई करण्यात आली आहे. पण तरीही भारताने पाकिस्तानला घायकुतीला आणले आहे, गुडघे टेकण्याच्या स्थितीत आणले आहे असे भारताच्या जोरदार प्रति हल्ल्यावरून म्हणता येईल. युद्धस्य कथा रम्य करण्यासाठी माध्यमांना बिनबुडाच्या बातम्या पेराव्या लागतात.

पार्कचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या विषयी वृत्त देताना भारतीय माध्यमांनी तसा अतिरेकच केला. या अघोषित युद्धामध्ये भारताने प्रतिहल्ला करणे इतकीच मर्यादित भूमिका घेतली आहे. पण आता रणनीती बदलून आक्रमक भूमिका घेतली पाहिजे असे युद्ध विश्लेषकांचे तसेच निवृत्त लष्करी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.

अघोषित युद्धाचे थेट वार्तांकन करायचे नाही असा केंद्र शासनाने फतवा काढला असला तरी त्याचे तंतोतंत पालन होत असल्याचे दिसत नाही. संरक्षण मंत्रालयाकडून जे व्हिडिओ दिले जातात तेच व्हायरल करण्याची मुभा आहे. तथापि काही वृत्तवाहिन्यांनी थेट कव्हरेज प्रक्षेपित केले आहे. पण ते सत्य आहे हे कसे मान्य करायचे? एका वाहिनीने पाकिस्तानात(Pakistan) नागरिकांना लष्करी प्रशिक्षण दिले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता आणि हाच व्हिडिओ दुसऱ्या वृत्तवाहिनीने दाखवताना दहशतवादी प्रशिक्षण घेत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे सत्य काय आहे हे कसे कळणार? डिजिटल तंत्र विकसित झालेले आहे, ए आय तंत्रज्ञान आले आहे. त्याचा वापर खोटी दृश्य तयार करण्यासाठी होऊ शकतो. या अघोषित युद्धात तो झालाच नाही असे म्हणता येणार नाही.

भारताची पाच लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडली अशी माहिती पंतप्रधान शहाबाद शरीफ यांनी त्यांच्या संसदेत दिली पण ती निघालं खोटी असल्याचे नंतर सिद्ध झाले. भारतातील”द हिंदू”या बड्या वृत्तपत्राने भारताची तीन विमाने पाक ने पाडली अशी निखालस खोटी बातमी प्रसिद्ध केली होती. आता त्या वृत्तपत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना पदावरून हटवले, त्यांच्या जागी शमशाद मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली, मुनीर यांना नजर कैदेत ठेवले आहे, ते तुर्कस्तानात पळाले अशा बातम्या भारतीय मध्यम आणि ठळकपणे दिल्या होत्या. आता हेच मुनीर शुक्रवारी शहाबाज शरीफ यांच्याबरोबर दिसले. हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू असताना, अघोषित युद्ध सुरू असताना कोणताही देश आपल्या लष्कर प्रमुखावर अशा प्रकारची कारवाई करणार नाही हे साधं व्यवहार ज्ञान आहे.

पाकचे(Pakistan) सर्व ड्रोन हल्ले भारताने हाणून पाडले आहेत. आत्तापर्यंत पाक नाही किमान 500 ड्रोन भारताच्या अनेक शहरांवर पाठवले होते पण एखादा दुसरा अपवाद वगळला तर भारताच्या आकाशात सुरक्षा प्रणालीने ते हवेतच नष्ट केले आहेत. या उलट भारताने चार हवाई तळ तसेच लॉन्चपॅड उध्वस्त केले आहेत. भारतीय लष्कराने पार्कचे नापास इरादे उधळून लावत चांगलेच थोबाड फोडले आहे. असे असले तरी आजही भारताने बचावत्मक पवित्रा घेतला आहे. हल्ल्याला प्रतिहल्ला असे त्याचे स्वरूप राहिले आहे. ही रणनीती आता बदलून आक्रमक धोरण स्वीकारले पाहिजे असे युद्ध विश्लेषक तसेच निवृत्त वरिष्ठ लष्करी अधिकारी सांगतात.

पाक कडे असलेले चायना मेड ड्रोन आता संपत आले आहेत किंवा संपले आहेत. म्हणून त्यांनी तुर्की ड्रोन बाहेर काढले आहेत. पण तेही भारतावर कोसळताना दिसत नाहीत. हवेतच दम सोडू लागले आहेत. तोही सिल्की साठा संपल्यानंतर काय? नवीन ड्रोन किंवा शस्त्रे तुर्कस्तानकडे मागितली जातील पण ती तुर्कीतून आणणार कशी? तुर्कस्तानने युद्धनौका पाठवली आहे पण ती नांगरून ठेवली आहे.

तुर्कस्तान थेट या अघोषित युद्धात उतरणार नाही किंवा तसे धाडसही तो करणार नाही. चीन , अझरबैजान, सोमालिया यांचा पाकिस्तानला पाठिंबा म्हणजे “तुम लढो हम कपडे संभालते है”अशा स्वरूपाचा आहे. तुर्कस्तान कडून शस्त्रे मिळाली तरी त्याचा वापर कसा करायचा यासाठी टाक लष्कराला आधी प्रशिक्षण घ्यावे लागेल. आणि ही प्रक्रिया तातडीने होणार नाही. त्याला कालावधी लागेल. तोपर्यंत भारताची लढाईचे कसे हा पाक समोरचा मोठा प्रश्न आहे. म्हणून मग भारताला भीती दाखवण्यासाठी अणू तज्ञांची बैठक शरीफ यांनी बोलावली होती. आम्ही अन्वस्त्राचा वापर करू असे त्यांना ही बैठक घेताना सुचवायचे आहे.

पाकिस्तानने(Pakistan) देशातील बहुतेक पेट्रोल पंप बंद केले आहेत. नागरिकांनी पेट्रोल पंपावर आपली वाहने घेऊन येऊ नयेत म्हणून अनेक जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. याचा अर्थ पाकिस्तान कडे पेट्रोलजन्य इंधनाचा साठा मर्यादित आहे. शस्त्राचा साठाही संपत आला आहे. काही अटी घालून नाणेनिधीने 8500 कोटी डॉलरचे कर्ज पाकिस्तानला नुकतेच मंजूर केले आहे.

त्यातील बराचसा पैसा आधी घेतलेल्या कर्जाचे व्याज फेडण्यासाठी खर्च होणार आहे. अशा अनेक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानला आता अघोषित युद्ध थांबवायचे आहे, पण मध्यस्थी करायला कोणी पुढे येताना दिसत नाही. सौदी अरेबियाच्या सुद्धा मध्यस्थीसाठी मर्यादा आहेत. एकूणच पहलगाम दहशतकांड पाकिस्तानला चांगलेच महागात पडले आहे.

हेही वाचा :

नवरा गाढ झोपला, बायको भयंकर रागावली, उकळतं तेल घेऊन आली, त्यानंतर… 

OnePlus चाहत्यांसाठी मोठी बातमी! भन्नाट फीचर्ससह ‘हा’ स्मार्टफोन लाँच होणार?

युद्ध नको, संवाद हवा! G-7 देशांचे भारत-पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आवाहन