युद्ध नको, संवाद हवा! G-7 देशांचे भारत-पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आवाहन

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संघर्ष(tension) अधिक वाढला आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांना उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानची भंबेरी उडाली होती. एवढे होऊनही पाकिस्तानची गुर्मी उतरलेली नाही. पाकिस्तानच्या सीमा नियंत्रण रेषेवर कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानने भारताच्या 26 शहरांना लक्ष्य करते ड्रोन हल्ले केले आहेत. परंतु भारताने पाकिस्तानचे हे हल्ले धूडकाऊन लावले आहेत. पाकिस्तानच्या एअरबेसवरही हल्ला चढवला आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या(tension) पार्श्वभूमीवर G-7 देशाचे वक्तव्य समोर आले आहे. G-7 देशांनी भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच शांततेच्या मार्गाने संवाद करुन लष्करी संघर्ष कमी करण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही अणुशक्ती देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर G-7 देशांनी निवेदन जारी केले आहे. G-7 मध्ये कॅनडा, फ्रान्स, इटली, जर्मनी, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपीय संघाचा समावेश होतो.

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी पर्टकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 28 निरापराध नागरिकांचा बळी गेला. दरम्यान G-7 देशांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व G-7 देशांचे परराष्ट्र मंत्री आणि युरोपीय संघाचे वरिष्ठ प्रतिनिधी पहलगाम हल्ल्याचा निषेध करतात. आम्ही दोन्ही देशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. भारत आणि पाकिस्तानने शांततेने संवाद साधावा आणि लष्करी तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे प्रादेशिक स्थिरतेला धोका निर्माण होणार नाही.

तसेच G-7 च्या देशांनी भारत आणि पाकिस्तानमधील वाढता लष्करी तणाव कमी करण्याचा आवाहन केले आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेबद्दल चिंताही व्यक्त केली आहे. यामुळे आम्ही शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचे दोन्ही देशांना आवाहन करतो. तसेच G-7 च्या देशांना पाकिस्तानला थेट संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.

भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान पश्चिम आघाडीवर आक्रमक कारवाया करत आहे. यामध्ये लढाऊ विमाने आणि ड्रोनचा वापर केला जात आहे. तसेच पाकिस्तानने नियत्रंण रेषेवर (LoC) जोरदार हल्ले केले आहेत. श्रीनगरपासून ते नालियापर्यंत 26 ठिकांणांवर हल्ले करण्यात आला आहे. यामध्ये बारामुल्ला, श्रीनगर, अवंतीपोरा, नगरोटा, जम्मू, फिरोजपूर, पठाकोणट, फाजिल्का, लालगड, जट्टा, जैसलमेर, बारमेर, भुज्ज, कुआरबेट आणि लाखी नाला या भागांमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसून आले.

हेही वाचा :

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा विकतसारखा बदाम शेक

नवरा गाढ झोपला, बायको भयंकर रागावली, उकळतं तेल घेऊन आली, त्यानंतर… 

OnePlus चाहत्यांसाठी मोठी बातमी! भन्नाट फीचर्ससह ‘हा’ स्मार्टफोन लाँच होणार?