भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर, देशभरातून भारतीय सैन्याला आणि सरकारला पाठिंबा मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी देखील समाजमाध्यमांवर पोस्ट आणि व्हिडिओद्वारे आपल्या भावना व्यक्त करत आहेत. याचदरम्यान, दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता(Actor) विजय देवरकोंडा याने एक अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्याचे चाहते आणि सर्वसामान्य नागरिक त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

बॉलिवूडपासून ते दक्षिणात्य चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाने आणि व्यक्तिमत्त्वाने सर्वांच्या मनात स्थान निर्माण करणारा अभिनेता विजय देवरकोंडा याने भारतीय सैन्याचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्याचा निर्धार केला आहे. त्याने आपल्या मालकीच्या ‘आरडब्ल्यूडीवाय’ या फॅशन ब्रँडमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक महत्त्वपूर्ण भाग भारतीय सैन्याला समर्पित करण्याची घोषणा केली आहे.
विजय देवरकोंडा याने ९ मे रोजी आपला ३६ वा वाढदिवस साजरा केला आणि याच विशेष दिवशी त्याने हा उदात्त निर्णय जाहीर केला. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटच्यास्टोरीवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये तो म्हणतो, “केवळ ‘मेड इन इंडिया’ नाही, तर ‘मेड फॉर इंडिया’. काही कालावधीसाठी ‘आरडब्ल्यूडीवाय’ च्या विक्रीतून मिळणाऱ्या कमाईचा एक हिस्सा भारतीय सेनेला दिला जाईल. जय हिंद!” त्याच्या या घोषणेनंतर समाजमाध्यमांवर आणि चित्रपटसृष्टीतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. ७ आणि ८ मे पासून भारतीय सैन्याने पाकिस्तानचे अनेक ड्रोनआणि क्षेपणास्त्र हल्ले परतवून लावले आहेत. या कठीण काळात, देशातील प्रत्येक नागरिक आपापल्या परीने भारतीय सैन्याला पाठिंबा देत आहे.

विजय देवरकोंडा(Actor) हा समाजमाध्यमांवर नेहमीच सक्रिय असतो आणि आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्याच्या या ताज्या घोषणेने, त्याने केवळ आपल्या चाहत्यांचीच मने जिंकली नाहीत, तर एक जबाबदार नागरिक म्हणून देशाप्रती असलेले आपले कर्तव्यही पार पाडले आहे. त्याच्या या कृतीमुळे इतर सेलिब्रिटींना आणि उद्योजकांनाही अशा प्रकारे पुढे येऊन देशाच्या कठीण काळात सैन्याला मदत करण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
अघोषित युद्धात, पाकची हानी! भारत रणनीती बदलणार?
युद्ध नको, संवाद हवा! G-7 देशांचे भारत-पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आवाहन
OnePlus चाहत्यांसाठी मोठी बातमी! भन्नाट फीचर्ससह ‘हा’ स्मार्टफोन लाँच होणार?