पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाच मोठ्या दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, या दशतवाद्यांची(terrorists) नावे आत समोर आली आहेत. खात्मा झालेल्या दहशतवाद्यांमध्ये मुदस्सर खादियान खास उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल (लष्कर-ए-तैयबा), हाफिज मुहम्मद जमील (जैश-ए-मोहम्मद), मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद जी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब (जैश-ए-मोहम्मद), खालिद उर्फ अबू आकाशा (लष्कर-ए-तैयबा) आणि मोहम्मद हसन खान (लष्कर-ए-तैयबा) अशी भारतानं 7 मे रोजी केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या पाच मोठ्या दशतवाद्यांची नावे आहेत.

७ मे रोजी पाकिस्तानमध्ये झालेल्या भारतीय हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेला मुदस्सर खादियान खास उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल याचा मृत्यू झाला असून, याच्या अंत्यविधीला पाकिस्तानी लष्कराचे सेवारत लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलिसांचे आयजी उपस्थित होते.
याशिवाय जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेला हाफिज मुहम्मद जमील याचाही खात्मा करण्यात आला असून, हा मौलाना मसूद अझहरचा मोठा भाऊ होता. याशिवाय जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असलेला आणि मौलाना मसूद अझहरचा मेहुणा मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद जी उर्फ मोहम्मद सलीम उर्फ घोसी साहब यालाही ठार करण्यात भारताला यश आले आहे. मोहम्मद युसूफ अझहर हा कंधार विमानतळावर झालेल्या IC 814 विमानाचे अपहरण प्रकरणात वॉन्टेड होता. ऑपरेशन सिंदूर
Details of terrorists killed in the Indian strikes on 7th May in Pakistan: Sources
— ANI (@ANI) May 10, 2025
1) Mudassar Khadian Khas @ Mudassar @ Abu Jundal. Affiliated with Lashkar-e-Taiba. His funeral prayer was held in a government school, led by Hafiz Abdul Rauf of JuD (a designated global…
. . तो . तो आयसी-८१४ अपहरण प्रकरणात हवा होता. ४) खालिद उर्फ अबू आकाशा. लष्कर-ए-तैयबाशी संबंधित. तो जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी(terrorists) हल्ल्यांमध्ये सहभागी होता आणि अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांची तस्करी करत होता.
त्यांचे अंत्यसंस्कार फैसलाबाद येथे झाले आणि त्यांना वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते. ५) मोहम्मद हसन खान. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित. ते पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील जैशचे ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी यांचा मुलगा होता. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांचे समन्वय साधण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
हेही वाचा :
अघोषित युद्धात, पाकची हानी! भारत रणनीती बदलणार?
युद्ध नको, संवाद हवा! G-7 देशांचे भारत-पाकिस्तानला तणाव कमी करण्याचे आवाहन
OnePlus चाहत्यांसाठी मोठी बातमी! भन्नाट फीचर्ससह ‘हा’ स्मार्टफोन लाँच होणार?