महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील रेशन कार्डधारक(Ration card) कुटुंबांना अन्नधान्याबरोबर दरमहा 1000 रुपयांची थेट आर्थिक मदत मिळणार आहे. ही “रेशन कार्ड अर्थसाह्य योजना 2025” 1 जूनपासून अंमलात येणार असून, गरजू कुटुंबांना थेट त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल.

या योजनेचा उद्देश काय? :
कोरोनानंतरच्या आर्थिक अडचणी, महागाईचा वाढता वेग आणि बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांना केवळ मोफत रेशनच(Ration card) नव्हे, तर निश्चित आर्थिक आधार मिळावा, यासाठी ही योजना राबवली जात आहे. यामुळे हजारो कुटुंबांना थेट मदतीचा फायदा होणार आहे.
कोण पात्र ठरणार? :
– अर्जदाराचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्डवर) असावे
– अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावे (उदा. ₹1 लाखापेक्षा कमी – अचूक मर्यादा लवकर जाहीर होईल)
– महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक
– लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी संलग्न असावे

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे:
शिधापत्रिका
आधार कार्ड
बँक पासबुक
उत्पन्नाचा दाखला
रहिवासी प्रमाणपत्र
हेही वाचा :
प्रसिद्ध गायकचा कार अपघातात मृत्यू…
छत्रपती शिवाजी महाराजांचे सी.बी.एस.इ.ला वावडे का?
भाजी खरेदीसाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाची पैशांच्या वादातून धारधार शस्त्रानं हत्या