महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (directly)राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची दिवसातून तीन वेळा हजेरी घेतली जाणार असून, गैरहजर असल्यास त्यांच्या पालकांना थेट SMS पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नव्या निर्णयाची अंमलबजावणी सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये होणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या नव्या नियमांमध्ये केवळ उपस्थितीच नव्हे तर सुरक्षा व्यवस्था, समुपदेशकांची नेमणूक, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची तपासणीही अनिवार्य करण्यात आली आहे. या आदेशामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत अधिक पारदर्शकता येणार असून, शाळांमध्ये सुरक्षित वातावरण तयार होण्यास मदत होईल.

राज्यभरातील शाळांमध्ये आता सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाईल. जर कोणता विद्यार्थी अनुपस्थित असेल, तर त्याच्या पालकांना तत्काळ SMS द्वारे याची माहिती दिली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे कारण लगेच समजू शकते आणि गैरप्रकार टाळले जाऊ शकतात.(directly)शालेय स्तरावर ही प्रक्रिया काटेकोरपणे राबवण्यासाठी शाळांना तातडीने निर्देश देण्यात आले आहेत. हजेरी प्रणालीच्या या नव्या यंत्रणेमुळे विद्यार्थी अनधिकृतरीत्या शाळेबाहेर राहण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.

विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शाळेच्या संपूर्ण परिसरात CCTV बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे कॅमेरे प्रवेशद्वार, वर्गाचे दरवाजे, कॉरिडॉर, मैदाने आणि स्वच्छतागृहांच्या बाहेर लावले जाणार आहेत. याशिवाय, मागील एक महिन्याचा CCTV फुटेज बॅकअप ठेवणे देखील आवश्यक करण्यात आले आहे.(directly)शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना पोलिस चारित्र्य पडताळणी आवश्यक असेल. गुन्हेगारी पार्श्वभूमी आढळल्यास त्यांची सेवा तत्काळ समाप्त करण्यात येणार आहे. यासोबतच, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, परिसरात पाणी, प्रकाश आणि आपत्कालीन घंटा असणे अनिवार्य आहे.
हेही वाचा :
वैष्णवी हगवणे प्रकरण भोवले! रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
डोनाल्ड ट्रम्पचे ‘Air Force One’ जगात भारी; राजेशाही थाट पाहून तुमचेही डोळे दीपतील
हॉटेलमधून चेक आउट करताना रुममधील ‘या’ 5 वस्तू घरी घेऊन जाऊ शकता