शिवसेनेचे वर्धापन दिन दोन देश प्रेमी कोण, गद्दार कोण?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गुरुवारी मुंबईत सायंकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी शिवसेनेच्या(politics) वर्धापन दिनाच्या निमित्ताने मिळावे झाले. अपेक्षेप्रमाणे दोन्ही ठिकाणी शिवसैनिकांना”रिचार्ज”करण्याचे प्रयत्न झाले. दोन ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमामागे मुंबई महापालिका निवडणुकीचे राजकारण होते.

शिवसेना फुटी नंतर पहिल्यांदाच मुंबई महापालिकेची(politics) निवडणूक येत असून ती कशी जिंकायची याची”मत पेरणी”या दोन्ही ठिकाणच्या मेळाव्यामध्ये करताना परस्परांवर टीका करण्याची भाषा तशीच जुनीच, दोन-तीन वर्षांपूर्वी पासून चालत आलेली. मराठी माणूस, हिंदी भाषेची सक्ती आणि ऑपरेशन सिंदूर हे नवे मुद्दे मांडताना गद्दार कोण आणि देशद्रोही कोण असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातील बराचसा वेळ परस्परांवर टीका करण्यासाठी खर्च केला.

निमित्त वर्धापन दिनाचे असले तरी मुंबई महापालिका निवडणूक हेच मिशन असल्याचे दोन्ही मिळून स्पष्ट झाले. गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. ती कोणत्याही स्थितीत आपल्या हातून जाता कामा नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी या मेळाव्यात दिले आहेत. शिवसैनिकांच्या मनातही तेच असल्याचे त्यांच्या मेळाव्यातील प्रतिसादावरून दिसून आले.

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने(politics) हिंदू विरुद्ध मुसलमान असे वातावरण केले आणि आता तर हिंदी सक्ती वरून मराठी विरुद्ध हिंदी भाषिक अशी हिंदू मध्येच फोटो पाडण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांनाही मुंबई शेठजींच्या घशात घालायची आहे अशा शब्दात भाजपवर टीकेची झोड उडवताना ठाकरे यांनी भाजपाला मराठी माणसाच्या हातातून मुंबई काढून घ्यायची आहे. मराठी माणसाने त्यांच्या या अशा प्रयत्नांना हाणून पाडले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नाना पाटेकर आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवले. कमऑन, किल मी! पण माझ्यावर चालून येताना लक्षात ठेवा, अमिताभ बच्चन यांच्याकडे ॲम्बुलन्स होती. याल तर तुम्हाला या ॲम्बुलन्स मधून जावे लागेल असा इशारा दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही ठाकरे यांनी टीकेचे आसूड ओढले. या मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.

वरळी डोम येथे झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या(politics) मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर हल्ला चढवला. त्यांच्या भाषणात काही जुनेच मुद्दे होते. ऑपरेशन सिंदूर नंतर सुरू झालेल्या प्रश्नांकित राजकारणाचा शिंदे यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला. पहलगाम येथे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी आमच्या आया बहिणींचे कुंकू पुसले.

महाराष्ट्रातील सहा मराठी कुटुंबे सुद्धा त्यात होती. आम्ही सांत्वनासाठी गेलो पण उद्धव ठाकरे हे इंग्लंडमध्ये सहलीचा आनंद घेत होते. त्यांनी या मराठी कुटुंबाचे साधे सांत्वनही केले नाही. ऑपरेशन सिंदूर बद्दल याच मंडळींनी संशय व्यक्त करताना भारतीय लष्कराचा घोर अपमान केला. त्यांच्या शौर्यावर शंका घेणारे हे देशद्रोहीच म्हटले पाहिजेत. अशी घणाघाती टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट कसा कमी‌ होत गेला याची आकडेवारी एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात दिली. मुंबई महापालिकेची सत्ता त्यांच्याकडेच होती. ते सत्तेतही होते. तर मग तेव्हा त्यांनी मराठी माणसासाठी काय केले? असा सवाल उपस्थित करताना मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर कसा फेकला गेला आणि त्याला ठाकरे कसे जबाबदार आहेत याचे विवेचन त्यांनी आपल्या भाषणात केले. “कम ऑन किल् मी”या त्यांच्या डायलॉगचा उल्लेख करताना जो आधीच मेला आहे, त्याला कोण मारणार? असा पलटवार केला.

एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणेच आमचीच शिवसेना कशी खरी आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही कसे पुढे नेत आहोत हे सांगितले. आणि बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी कशी संपवली. त्यांचे विचार कसे काँग्रेसच्या दावणीला बांधले
अशा प्रकारची जुनीच टीका पुन्हा नव्याने केली.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे(politics) या दोघांच्याही भाषणात मुंबईतील मराठी माणसावर प्रभाव टाकणारे मुद्दे नव्हते. हिंदी भाषा सक्तीच्या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी कोणतेही भाष्य केले नाही. तर उद्धव ठाकरे यांनी पहेलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर या विषयाला स्पर्शही केला नाही.

महायुतीचा एक प्रमुख घटक असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकीकडे मेळावा सुरू असताना महायुतीमध्ये असलेल्या एका घटक पक्षाच्या वसंत मोरे यांनी शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्या अघोरी पूजेचे व्हिडिओ व्हायरल केले, आणि ते वृत्तवाहिन्यांवरून ठळकपणे दाखवले जात होते. महायुती मधील”वस्त्रहरणा”चा हा खेळ लोकांचे मनोरंजन करणारा ठरला. त्याबद्दलचा खुलासा भरत गोगावले यांनी केला असला तरी तो सर्वसामान्य जनतेला पटणारा नव्हता.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करण्याबद्दलचे संकेत मिळाले असले तरी या मेळाव्यात त्यांच्याकडून अनौपचारिक युतीची घोषणा होईल असे शिवसैनिकांना अपेक्षित होते, प्रत्यक्षात मात्र जे महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि माझ्या शिवसैनिकांच्या मनात जे आहे तेच होईल हेच वाक्य पुन्हा एकदा त्यांच्याकडून अधोरेखित करण्यात आले.

हेही वाचा :

मी आणि माझा बबड्या…; शिंदेंच्या मेळाव्यानंतर मनसेने डिवचलं

आवडत्या महिलेसोबत लग्न करुनही पुरुष का करतात Extra Marital Affair? 

कोल्हापूरात पतीसोबत भांडण पत्नी लेकरांसह घरातून निघाली अन्, तळ्यात मारलेली उडी ठरली अखेरची…