देशातील कोट्यवधी मोबाईल वापरकर्त्यांसाठी निराशाजनक बातमी आहे.(expensive)टेलिकॉम कंपन्या लवकरच त्यांच्या रिचार्ज योजनांचे दर पुन्हा वाढवण्याच्या तयारीत आहेत. आर्थिक सल्लागार संस्था जेफरीजच्या अहवालानुसार, जिओ आणि एअरटेलने ग्राहक संख्येत झपाट्याने वाढ केली आहे, तर व्होडाफोन आयडियाला मोठ्या प्रमाणावर ग्राहक गमवावे लागले आहेत. यामुळे मोबाईल सेवा क्षेत्रात दरवाढीस पोषक वातावरण तयार झाले आहे.

मे 2025 मध्ये सलग पाचव्या महिन्यात मोबाईल ग्राहक संख्येत वाढ नोंदवण्यात आली. देशभरातील सक्रिय मोबाईल वापरकर्त्यांची संख्या 1.08 अब्ज इतकी झाली आहे, जी मागील 29 महिन्यांतील सर्वोच्च आकडेवारी आहे. यामध्ये रिलायन्स जिओने 5.5 दशलक्ष सक्रिय ग्राहकांची वाढ नोंदवून आपला बाजारातील हिस्सा 53% पर्यंत नेला, तर भारती एअरटेलने 1.3 दशलक्ष नवीन सक्रिय ग्राहक जोडले.
टेलिकॉम कंपन्या 5G यंत्रणेशी सुसंगत दररचना आणण्यासाठी तयारी करत आहेत. (expensive)याअंतर्गत डेटा वापर, स्पीड आणि वेळ यावर आधारित टप्प्याटप्प्याने दर लावण्याचा विचार केला जात आहे. पुढील दरवाढ 10-12% दरम्यान असू शकते, जी 2025 अखेर लागू होण्याची शक्यता आहे. याआधी जुलै 2024 मध्ये कंपन्यांनी त्यांच्या बेस प्लानमध्ये 11-23% दरवाढ केली होती.विशेषज्ञांच्या मते, यावेळी दरवाढीत प्रामुख्याने मध्यम व उच्च वर्गातील ग्राहकांना लक्ष्य केले जाईल, जे अधिक डेटा वापरतात. यामुळे सामान्य ग्राहकांवरील ताण तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. तथापि, डेटा मर्यादा कमी करून ग्राहकांना अतिरिक्त डेटा पॅक घेण्यास प्रवृत्त केले जाणार आहे.
दुसरीकडे, हैदराबादस्थित अॅनंथ टेक्नोलॉजीज या भारतीय खासगी कंपनीने देशातील सॅटेलाईट ब्रॉडबँड क्षेत्रात प्रवेश केला आहे. ही सेवा स्वदेशी उपग्रहांच्या आधारे दिली जाणार असून कंपनीने IN-SPACe कडून अधिकृत मंजुरी मिळवली आहे. स्टारलिंक अद्याप परवानगीच्या प्रतीक्षेत असतानाच अॅनंथ टेक्नोलॉजीजने 4 टन वजनाचा GEO कम्युनिकेशन सॅटेलाईट अवकाशात सोडण्याची योजना आखली आहे. कंपनीचा उद्देश आहे की 100 Gbps पर्यंत स्पीड देणारी इंटरनेट सेवा देशात उपलब्ध करून द्यावी. यासाठी सुमारे 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
2025 च्या अखेरीस मोबाईल सेवा अधिक महाग होणार असल्यामुळे ग्राहकांनी आता जागरूक राहणे गरजेचे आहे. (expensive)दरवाढीचा फटका मुख्यतः मोठ्या डेटा वापरकर्त्यांना बसण्याची शक्यता असून, सामान्य वापरकर्त्यांना तुलनेत सौम्य परिणाम होईल. दुसरीकडे सॅटेलाईट इंटरनेटच्या नव्या युगाची सुरुवात होत असल्यामुळे भारतात डिजिटल क्रांतीला अधिक वेग येणार आहे.रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि इतर टेलिकॉम कंपन्या दरवाढ करणार आहेत.टेलिकॉम कंपन्या प्रामुख्याने प्रीमियम आणि जास्त डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करत आहेत.डेटा मर्यादा कमी करून ग्राहकांना अतिरिक्त डेटा पॅक घेण्यास प्रवृत्त केले जाणार आहे.
हेही वाचा :
शंभर कोटी रुपयांचे रस्तेच चोरीला गेलेत !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय!