२६ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे विद्यार्थ्यांना केले आवाहन?

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू केलेले 26 दिवसांचे अन्नत्याग आंदोलन सोनम वांगचुक यांनी समाप्त केले आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. उपोषण सोडल्यानंतर (Sonam Wangchuk) त्यांनी देशातील विद्यार्थी आणि समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून सरकारसोबत झालेल्या चर्चेचा तपशील लवकरच जाहीर करणार असल्याचेही स्पष्ट केले.गेल्या 26 दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करणारे सोनम वांगचुक यांनी शुक्रवारी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू असतानाच अधिकृतपणे उपोषण सोडले. केंद्र सरकारसोबत अनेक फेऱ्यांत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. उपोषण समाप्त करताना केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह उपस्थित होते.

उपोषण संपवल्यानंतर वांगचुक यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावनिक पोस्ट शेअर केली. त्यांनी लिहिले की, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, डॉ. जितेंद्र सिंह तसेच लेह-लद्दाखच्या ॲपेक्स बॉडी मधील वरिष्ठ प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण समाप्त केले. (Sonam Wangchuk) तसेच विविध राजकीय पक्षांतील तब्बल 65 खासदारांनी प्रत्यक्ष भेट घेऊन किंवा पत्राद्वारे उपोषण मागे घेण्याची विनंती केल्याचाही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला.

केंद्र सरकारसोबत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर आणि देशात संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केले. सरकारसोबत झालेल्या चर्चेतील अटी आणि त्यावरील सहमतीचा संपूर्ण तपशील लवकरच स्वतंत्र व्हिडिओद्वारे देशासमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Sonam Wangchuk) यासोबतच कोणत्याही परिस्थितीत हिंसाचार होऊ नये यासाठी नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सतर्क राहावे, असेही त्यांनी आवाहन केले.

दरम्यान, उपोषण समाप्त झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘X’ वर पोस्ट करून प्रतिक्रिया दिली. त्यांनी सोनम वांगचुक यांच्या उत्तम प्रकृतीसाठी शुभेच्छा व्यक्त करत डॉक्टरांच्या सल्ल्याचे काटेकोर पालन करण्याचा सल्ला दिला. वांगचुक यांनीही आपल्या समर्थकांना, तरुणांना आणि देशवासीयांना शांतता राखण्याचे आवाहन करत आंदोलनादरम्यान कोणत्याही असामाजिक घटकांना हिंसाचार किंवा कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याची संधी देऊ नये, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच सरकारसोबत झालेल्या करारातील सर्व मुद्दे लवकरच विशेष व्हिडिओ संदेशातून जाहीर करण्यात येतील, असे त्यांनी पुन्हा एकदा नमूद केले.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?