कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी :
चांगल्या हेतूने केलेले कायदे हे कायद्याच्या पुस्तकाच्या बाहेर येत नाहीत.(Prevention)हुंडा प्रतिबंधक कायदा हा त्यापैकीच एक होय. हुंडा मागितला, तो स्वीकारला म्हणून एकही गुन्हा आज पर्यंत कोणत्याही पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचे उदाहरण नाही किंवा ऐकिवात नाही. मात्र विवाह पश्चात हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक, छळ केल्याचे अगणित गुन्हे दाखल झाल्याचे चित्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसेल. हुंड्यासाठी सुरू असलेला छळ असह्य झाल्याने नवविवाहित तरुणींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही अनेक घडल्या आहेत. वास्तविक त्या विवाह सारख्या पवित्र संस्काराच्या घोर अपमान करणाऱ्या शोकांतिकाच आहेत. वैष्णवी हगवणे या नवविवाहितेने गळफास लावून घेऊन केलेली आत्महत्या पुण्यनगरी म्हणून समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात घडलेली, समाजाला चिंतीत करणारी शोकांतिका आहे.

वैष्णवी हगवणे हिने स्वतःहून गळफास लावून घेतला की आधी तिचा गळा आवड खून केला आणि मग तिचा मृतदेह लटकावला हे शव चिकित्सा अहवालातून स्पष्ट होईल. हगवणे कुटुंबीयांची विकृत मानसिकता, त्यांच्यातील क्रूरता पाहता या गुन्ह्याचा तपास खून झाल्याचे गृहीत धरून केला गेला पाहिजे. म्हणजे अतिशय गांभीर्याने तो केला पाहिजे. हगवणे कुटुंबाला थोड्याफार प्रमाणात राजकीय पार्श्वभूमी आहे. (Prevention)वैष्णवीचा सासरा राजेंद्र हा अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे. त्याच्या घरी कार्यकर्त्यांची ये/जा, वर्दळ असणारच. पण एकाही कार्यकर्त्याला त्याच्या घरातील वातावरणाचा अंदाज आला नसावा. आणि म्हणूनच
वैष्णवीचा” आवाज”बाहेर किंवा समाजापर्यंत आला नाही.
हगवणे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. घरातील सर्व सदस्य शिक्षित किंवा उच्चशिक्षित आहेत. राहणीमान उत्तम असल्याने सामान्य माणसाच्या दृष्टीने ते प्रतिष्ठित आहेत. या आभासी वातावरणाला वैष्णवी चे आई-वडील फसले. वास्तविक हगवणे कुटुंबात आपली मुलगी देण्यापूर्वी पुरेशी चौकशी करणे आवश्यक होते. या कुटुंबाच्या स्वभावाची, त्यांच्या वर्तनाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता तर ती मिळाली असती. लग्नाची बोलणी चालू असताना देण्याघेण्याचा व्यवहार ठरवला जात असताना हगवणे कुटुंबाचा लालची स्वभाव त्यांना लक्षात आला नाही हे वैष्णवीच्या कुटुंबाचे दुर्दैव म्हणावे लागेल. 51 तोळे म्हणजे जवळपास अर्धा किलो वजनाचे सोन्याचे दागिने, साडेसात किलो वजनाची चांदीची भांडी, फोरचुनर गाडी हगवणे कुटुंबाला हुंडा म्हणून देण्यात आली. जणू काही हगवणे कुटुंबाने शशांक याला विक्रीस काढले होते. हगवणे कुटुंबाने जे जे मागितले, तेथे वैष्णवीच्या वडिलांनी दिले. (Prevention)असा हा एकूण हुंड्याचा व्यवहार होता. मागेल ते मिळतंय म्हटल्यावर ते मागतच सुटले. जेव्हा त्यांनी दोन कोटी रुपये मागितले तेव्हाच वैष्णवीच्या वडिलांनी सावध व्हायला हवे होते. पण पुढे काही भयंकर घडेल याची कल्पना त्यांना आली नाही.

आपण स्वतः घरी पक्षाचे पदाधिकारी आहोत. अजितदादांच्या विश्वासातील आहोत. आपलं कोणीही काहीही वाकडं करू शकणार नाही. अशी उन्मादी मानसिकता वैष्णवीच्या सासर्याची तसेच संपूर्ण कुटुंबाची होती. म्हणूनच वैष्णवी चे हुंदके चार भिंतीच्या बाहेर आले नाहीत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणे कुटुंबा चे कारनामे त्यांच्याच घरातून सुखरूप बाहेर पडलेल्या मयुरी जगताप नामक थोरल्या सुनेने प्रसारमाध्यमासमोर मांडले आहेत. मयुरीने स्वतःला हगवणे कुटुंबियांकडून किती भयानक मारहाण झाली होतीयाचे फोटो माध्यमांना गुरुवारी दाखवले.
वैष्णवीच्या विवाह सोहळ्याला अजितदादा पवार हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते फॉर्च्युनर गाडीची चावी शशांक हगवणे याला देण्यात आली. असे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले. तेव्हा अजितदादा संतप्त झाले. मी एखाद्याच्या लग्नाला हजर राहिलो हा काय माझा गुन्हा आहे काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे आणि तो योग्य आहे. मात्र त्यांनी वैष्णवीच्या मृत्यूबद्दल सहवेदना व्यक्त केल्या नाहीत. हे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. वैष्णवी चा सासरा राजेंद्र हगवणे याला पक्षातून त्यांनी निष्कासित केले आहे. तो आपला जवळचा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी अंगावरील झुरळ झटकावे तसेच झटकून टाकले आहे. कोणताही नेता आपल्या कार्यकर्त्याला चुकीचे वागा असे सांगत नाही मात्र आपला नेता अडचणीच्या वेळी आपल्या मागे उभा राहील, पोलीस कारवाई होणार नाही याची काळजी घेईल अशी मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये तयार होते याचा अर्थ काय समजायचा?
पिंपरी चिंचवड मध्ये वैष्णवी ह्या गावाने आत्महत्या प्रकरण घडले तर अवघ्या काही तासात हडपसर येथे देवाची प्रसाद पुजारी उर्फ दीपा या नव विवाहित तरुणीने हुंड्यासाठी छळ केला जातो म्हणून आत्महत्या केली आहे.
या दोन्ही प्रकरणाचा तपास होईल. संबंधितांना अटक केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी आत्महत्या प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. वैष्णवी हगवणे हिला मृत्युपश्चात न्याय मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.यानिमित्ताने हुंडा प्रतिबंधक कायदा किती निष्क्रिय आहे हे स्पष्ट झाले आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा हा असाच निष्क्रिय आहे. एका वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकाऱ्याने तर हा कायदा नपुंसक असल्याचे म्हटले होते. नवऱ्याने दुसरे लग्न केले म्हणून एखादी महिला पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास गेली तर तिची फिर्याद घेतली जात नाही. कारण एखाद्याने पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करताना, पहिल्या पत्नीने लग्न मंडपात येऊन हरकत घेतली किंवा पोलिसांना घेऊन ती घटनास्थळी पोहोचली तरच या कायद्याखाली गुन्हा दाखल होतो. गुन्ह्याचे वर्तुळ पूर्ण झाल्यानंतर हा कायदा निष्क्रिय होतो. म्हणजे दुसरा लग्न सोहळा पूर्ण झाल्यानंतर पोलिसांना त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे हे कायदे, कायद्याच्या पुस्तकात पाने अडवून बसलेली असतात. कारण ते असून नसल्यासारखे असतात.
हेही वाचा :
अभिनेत्रीने बॉलिवूडला ठोकला रामराम चाहत्यांना धक्का..!
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया