कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : निसर्गाचे(nature) असे काही नियम असतात. नियमांची चौकट तो सहसा मोडत नाही आणि मोडलीच तर माणसाप्रमाणे निसर्ग सुद्धा बदलला बघा! असे म्हटले जाते. यंदा असेच नियम बाजूला ठेवून पाऊस आला आहे. ऐन वैशाखात आलेल्या पावसाने हवामानात अज्ञान सह साऱ्यांनाच चकितच नव्हे तर अनेक ठिकाणी भयचकित करून सोडले आहे. साधारणपणे मे महिन्यात धरणातील पाणी संचय किती कमी होत चालला आहे याची माहिती मिळत असते.

यंदा मात्र पाणीसाठ्यात किती वाढ होत चालली आहे याची माहिती समोर येऊ लागली आहे. कोल्हापूर सह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात साधारण पूर आलेला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. मे महिन्याच्या साधारणतः दुसऱ्या आठवड्यापासून वळीव पाऊस अधून मधून येतो. येताना वादळी वाऱ्यासह येतो, आकांड तांडव करीत येतो. धूसमुसळेपणा करतो आणि पटकन गायब होतो. पुन्हा लख्ख उजेड पडतो. हवेत गारवा निर्माण करतो.
मे महिन्याच्या शेवटच्या चरणात पेरणी पूर्व कामे पूर्ण करून शेत पेरणीसाठी तयार केले जाते. ही सर्व कामे रोहिणी नक्षत्र केली जातात. आणि मग बळीराजाचे लक्ष मृग नक्षत्राकडे लागते. सात जून रोजी मृग नक्षत्र सुरू होते. जमीन थोडीफार ओली करून तो निघून जातो. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे.
आठ दिवस अगोदरच केरळमध्ये(nature) मान्सून दाखल झाला होता, चार दिवसापूर्वी तो महाराष्ट्राच्या वेशीवर होता आणि आता तर तो सुरूच झाला आहे. मान्सून पूर्व पाऊस हा वाकडा तिकडा पडत असतो. यंदा मात्र मान्सूनने राज्यभर संततधार सुरू केली आहे. ऋतूचक्राचे नियम मोडून, पाऊस आला आहे आणि गेल्या आठ दिवसांपासून तो पडतोच आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कोल्हापूरकरांनी तर सूर्याची किरणे पाहिलेली नाहीत.
यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. कारण धरणाक्षेत्रात पाऊस धारा सुरू आहेत. कोल्हापूर सह राज्यातील बहुतांशी धरणामध्ये पाणी संचय होऊ लागला आहे. यंदाच्या मार्च एप्रिल महिन्यात धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले होते. परिणामी पाणीसाठा कमी होत चालला होता. पण आता हे संकट टळले आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचे हवामान तज्ञांचे अंदाज आहेत . सध्या सुरू असलेल्या पावसाने उघडी पण नाही दिली, उलट तो जास्तच कोसळू लागला आणि धरणातील पाणी साठवण्याचे आणि सोडण्याचे नियोजन चुकले तर जल संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित 2019 आणि 2021 ची पुनरावृत्ती होण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातील पाणी पुढे सोडण्याचे नियोजन केले नाही तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.
इसवी सन 2019 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रावर(nature) पाऊस संकट आले होते. दक्षिण महाराष्ट्राची वाताहत झाली होती. सर्वत्र प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले होते. नागरी वस्तीमध्ये आतपर्यंत महापुराचे पाणी घुसले होते तर राष्ट्रीय महामार्गावर पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प केली होती. तेव्हा उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन गंभीर जल संकटाची पाहणी केली होती. त्यावेळी महापुराचे पाणी नागरी वस्तीत घुसू नये म्हणून उभी भिंत घालण्याची चर्चा सुरू होती.
त्यानंतर कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महापुराचे पाणी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांकडे वळवण्याचे निर्णय झाले. जागतिक बँकेकडून या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी अर्थसहाय्य मागण्यात आले. या बँकेची एक टीम या परिसरात येऊन पाहणी करून गेली. दोन दिवसापूर्वी इचलकरंजीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचे काम लवकर सुरू होईल आणि त्याच्या निविदाही येत्या काही दिवसात काढण्यात येतील असे सांगितले आहे.
महापुराचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांकडे वळवण्याच्या प्रकल्पाच्या निविदा जरी काढल्या गेल्या तरी त्याचे काम आणखी काही महिने तरी होण्याची शक्यता नाही. कारण पावसाचा हंगाम सुरू झालेला आहे. उन्हाळ्यात सुरू झालेल्या पावसाने कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये साधारण पूरस्थिती निर्माण केली आहे. त्यातच मुंबई सह इतर महानगरातील नालेसफाईची कामे पूर्ण झालेली नाहीत.
परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावर आलेले दिसते. या पावसाने खरीप हंगामाची सुद्धा मोठ्या प्रमाणावर हानी केलेली आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने महसूल विभागाला दिलेले आहेत. दरम्यान आपत्कालीन व्यवस्थापन समितीकडून रेस्क्यू ऑपरेशनच्या रंगीत तालमी सुरू झालेल्या आहेत. एकूणच प्रशासन सज्ज झाले आहे. पूर रेषेत राहणाऱ्या लोकांचे मात्र धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा :.
आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींची संकटं होणार दूर, बाप्पा करणार रक्षण
मनसे नेत्याला गांजा तस्करी प्रकरणी अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
कोल्हापुरात माजी उपसरपंचाची ग्रामपंचायतीत घुसून लिपिकाला मारहाण CCTV त घटना कैद