कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सिंधू नदीत एक तर आमचे पाणी वाहील नाही तर त्यांचे रक्त वाहिल, अशी वल्गना करणाऱ्या, पाकिस्तानचा(Pakistan) माजी परराष्ट्रमंत्री राहिलेल्या बिलावल भुत्तो याने इतिहासाची पाने वाचलेली नसावीत किंवा इतिहास हा विषय त्याचा पूर्णपणे कच्चा असावा. कारण भारताशी एक हजारो वर्षे युद्ध करू अशी भाषा करणारे त्याचे आजोबा जुल्फीखार अली भुट्टो हे 1971 च्या सिमला करारासाठी भारतात दाती तृण धरून आले होते.

इसवी सन 1971 च्या बांगला युद्धात भारताने एकतर्फी विजय मिळवून पाकिस्तानला(Pakistan) खडे चारले होते. पाकिस्तानचा जनरल नियाजी हा 90 हजार सैन्यासह भारताचे जनरल जगजीत सिंह अरोरा यांच्यासमोर गुडघे टेकून शरण आला होता. शरणागतीच्या करारावर त्याने दिनांक 16 डिसेंबर 1971 रोजी सही केली होती. या युद्धात पाकिस्तानचा अतिशय नामुष्कीजनक पराभव झाला होता.
युद्ध संपल्यानंतर भारताशी तह करण्यासाठी जुल्फीकार अली भुट्टो भारतात यावयास निघाले होते. विशेष म्हणजे याचा भुट्टो यांनी आम्ही भारताशी एक हजार वर्षे युद्ध करू अशी जाहीरपणे दर्पोक्ती केली होती. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांच्याशी द्विपक्षीय करार करण्यासाठी ते खास विमानाने सिमला येथे या वयास निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांची कन्या बेनझीर भुट्टो या होत्या.
बेनझीर भुट्टो यांना तेव्हा राजकारण फारसे माहित नव्हते. आपले वडील भारतामध्ये कशासाठी निघाले आहेत याचीही कल्पना त्यांना नव्हती. विमानात बेनझीर यांनी त्यांच्या वडिलांना म्हणजे भुट्टो यांना विचारले की आपण भारतामध्ये कशासाठी निघालो आहोत?
तेव्हा युद्ध हरलेल्या भुट्टो यांनी”आपण हातात कटोरा घेऊन चाललो आहोत. या कटोऱ्यात जे काही पडेल ते घेऊन आपण आपल्या देशाला पाकिस्तानला परतणार आहोत”असे भुट्टो यांनी बेनझीर यांना उत्तर दिले होते. पुढे बेनझीर या पाकिस्तानच्या राजकारणात आल्या. राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातच मिळाले होते.
पाकिस्तानच्या(Pakistan) त्या पंतप्रधान असताना त्यांचे झरदारी यांच्याशी लग्न झाले होते. त्यांनी”डॉटर ऑफ ईस्ट” हे आत्मचरित्र लिहिले होते आणि त्याचा मराठी अनुवाद पूर्वेची कन्या या नावाने आला होता. या पुस्तकात त्यांनी सिमला करार होताना आपण आपले वडील जुल्फीखार भुट्टो यांच्याबरोबर भारतात कसे आलो होतो आणि तेव्हा पाकिस्तानची स्थिती काय होते याविषयी एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. जुल्फीखार भुट्टो यांची तेव्हाची पराभूताची अवस्था त्यांनी या पुस्तकात सांगितली आहे.

सिमला करार जेव्हा झाला तेव्हा बिलावल भुट्टो यांचा जन्मही झाला नव्हता. त्यांनी आपल्या आईने लिहिलेले आत्मचरित्रही वाचलेले नसावे.पाकिस्तानचा भारताकडून झालेल्या पराभवाचा, पाकिस्तानच्या पराभवाच्या मालिकेचा इतिहास त्यांनी वाचलेला नसावा किंवा तो माहीत असूनही उसने अवसान आणून ते सिंधू नदीतून भारतीयांचे रक्त वाहिल अशी वल्गना करीत असावेत.
सिंधू पाणी वाटप करा आम्ही स्थगित करीत आहोत अशी केवळ घोषणा केल्यानंतर पाकिस्तानच्या अंगाचा तीळ पापड झालेला आहे. सिंधू नदी ही पाकिस्तानची(Pakistan) जीवनवाहिनी आहे. जवळपास 70 टक्के शेती सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. ही जीवन वाहिनी प्रत्यक्षात खंडित केल्यानंतर पाकिस्तानाची अवस्था काय होणार आहे याची कल्पनाच केलेली बरी. हे लगेच होणार आहे असे नाही पण एक दिवस होणार आहे हे मात्र नक्की.
पाकिस्तानचे(Pakistan) परराष्ट्रमंत्री असताना याच बिलावल भुट्टो याने संयुक्त राष्ट्र संघात भाषण करताना भारताविरुद्ध जहाल भाषा वापरली होती. आपण पाकिस्तानात भाषण करत नसून संयुक्त राष्ट्रसंघात भाषण करत आहोत आणि तिथे भाषण करताना कोणती भाषा बोलायची याचे भानही त्यांना तेव्हा राहिले नव्हते. भारताने त्याच वेळी त्यांच्या भाषणाचे वाभाडे काढले होते. सिंधू पाणीवाटप कराराच्या संदर्भात आकांड तांडव करताना बिलावल यांनी आपण राजापेक्षा राजनिष्ठ आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांच्या मर्जीत येण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे असे म्हणता येईल.
हेही वाचा :
अक्षय्य तृतीयेला राजयोग, या राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता
दररोज चिकन खाणाऱ्यांना कॅन्सरचा धोका अधिक? महिला की पुरुष कुणी घ्यावी काळजी
‘ती येत नाही तोपर्यंत…’, इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून तरुणाने उचललं भयंकर पाऊल, कॉलेजच्या आवारातच….