राजकारणातील शून्य आणि वर्तुळ

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शून्य आणि वर्तुळ यांच्यात विलक्षण साम्य आहे. पण शून्यात एकटेपण असते आणि वर्तुळात आपली माणसं असतात. राजकारणी(politics) हा सत्तेच्या बाहेर म्हणजे शून्यात जातो तर कधी शून्यातून सत्तेच्या वर्तुळात येतो. प्रत्येक राजकारणी हा अधून मधून या अनुभवातून जातच असतो.

काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सतेज पाटील यांनी स्वतःच जिल्ह्याच्या राजकारणात मी एकटा पडलो आहे अशी कबुली देऊन टाकली आहे. याचा अर्थ ते शून्यात गेले आहेत. कधी त्यांचे राजकीय(politics) शत्रू महाडिक हे सुद्धा शून्यात गेले होते. खरंतर राजकारणातील नेत्यांनी”आजचा दिवस माझा”अशी मानसिकता ठेवून काम करायचे असते. हे ज्याला जमले तो खरा राजकारणी होय.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने कोल्हापूर जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर सोपवली पण आघाडीचा धक्कादायक पराभव झाला. काँग्रेसच्या आहे त्या चार जागाही राखता आल्या नाहीत. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांना त्यांनी निवडून आणले पण हा विजयाचा आनंद त्यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकवता आला नाही. विधानसभा निवडणुकीतील मोठा पराभव सतीश पाटील यांना चांगलाच जिव्हारी लागला.

गोकुळ दूध संघातील त्यांची एक हाती सत्ता महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्याकडून काढून घेतली. मोठ्या हिमतीने आणि चतुराईने सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघातील महादेवराव महाडिक यांच्या सत्तेला चार वर्षांपूर्वी सुरुंग लावला होता. पण अरुण डोंगळे यांच्या राजकीय महत्वकांक्षेचा “पान्हा” फुटला. आणि त्यातून या संघात पहिल्यांदा राजकीय(politics) पक्षांचा थेट हस्तक्षेप झाला. अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित दादा पवार यांनी लक्ष घातले.

सतेज पाटील यांना हा दुसरा मोठा धक्का होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर त्यांचे जवळचे कार्यकर्ते त्यांना सोडून जाऊ लागले आहेत. शारंगधर देशमुख हे त्यापैकीच एक होत. कार्यकर्त्यांना गृहीत धरून राजकारण करण्याचा त्यांना असा हा फटका बसला आणि बसतो आहे. कोण आलं आणि कोण सोडून गेलं मला काय फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया देणारे सतीश पाटील अवघ्या काही दिवसातच मी एकटा पडलो अशी कबुली देतात.

हसन मुश्रीफ हे त्यांचे राजकीय मित्र आता त्यांच्या राजकीय शत्रूंचे (धनंजय महाडिक यांचे) मित्र बनले आहेत. त्यांनी सतीश पाटील यांच्या एकटेपणावर उपरोधिक टीका केली आहे. राजकारणात आम्ही एकटे पडलो होतो पण आम्ही त्रागा
करून टीव्ही वगैरे फोडला नाही. अशी भोसरी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांच्यावर केली आहे.

तीन वर्षांपूर्वी हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीचे मोठे संकट आले होते. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, गडहिंग्लज येथील गोड साखर कारखाना या त्यांच्या संस्था तेव्हा अडचणीत आल्या होत्या. तेव्हा ते राजकारणात(politics) आणि व्यक्तिगतही शून्यात जाणार असे वातावरण होते. तथापि अगदी अल्पकाळात ते पुन्हा सत्तेच्या वर्तुळात आले. या जिल्ह्यातील जनतेने रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा राजकीय वनवास पाहिला आहे. त्यांना शून्यात जाताना पाहिले आहे.

त्यांच्याप्रमाणेच अनेक नेते राजकीय शून्यातून पुन्हा सत्तेच्या वर्तुळात आले होते. कोल्हापूर शहर आणि एखादा अपवाद वगळता हा जिल्हा काँग्रेसकडे होता. पण काँग्रेसला शून्याचा टाकून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने इथे सत्ता वर्तुळ तयार केले होते. आजच्या राजकारणाचा विचार केला तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या जिल्ह्यात सध्यातरी शून्यात गेली आहे.

हेही वाचा :

छेड काढणाऱ्या तरुणाला तरुणींनी दाखवले तारे; लाथ मारली अन्…, Video Viral

बॉयफ्रेंड की मित्र? गर्लफ्रेंड रात्री कुणासोबत थांबणार? वाद टोकाला गेला अन्..मध्यरात्री नको ते घडलं

Love Marriage असो वा अरेंज मॅरेज, का तुटत आहेत नाती? प्रेमानंद महाराजांनी दिले मोठे कारण