इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यावर ट्रॅव्हलची दिवसाही वाहतूक नियमांची पायमल्ली – नागरिक त्रस्त

इचलकरंजी शहरातील मुख्य रस्ता जो सकाळी ८.३० वाजल्यापासून रात्री ८.३० वाजेपर्यंत(violated)ट्रॅव्हलसाठी बंद ठेवण्यात आला आहे, त्या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. स्थानिक प्रशासनाने वाहतूक सुरळीत राहावी व वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ट्रॅव्हलना या वेळेत प्रवेश नाकारला आहे.

मात्र प्रत्यक्षात दिवसभर या मुख्य रस्त्यावर ट्रॅव्हल उभ्या राहून प्रवासी भरताना दिसत आहेत. काहीजण प्रवासासाठी थांबलेले असतात तर काही ट्रॅव्हल चालक रस्त्यातच गाड्या पार्क करून प्रवासी भरण्याचे काम करत असतात. परिणामी, या मार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि वेळेचा अपव्यय यामुळे सामान्य नागरिक संतप्त आहेत. स्थानिक व्यापारी व रस्त्यावरील वाहनचालक यांच्यामध्येही यावर तीव्र नाराजी आहे.(violated)अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “जर नियमच पाळायचे नाहीत तर बंदीचे आदेश का काढले?”, असा सवाल आता शहरवासीय विचारत आहेत.

यावर त्वरित कारवाई करून ट्रॅव्हल चालकांवर दंडात्मक कारवाई व्हावी, तसेच रस्त्यावर पोलिसांची नियमित उपस्थिती असावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे(violated).शहरातील शिस्तबद्ध वाहतुकीसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल अत्यावश्यक असल्याचे आता स्पष्टपणे जाणवत आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीत बसवेश्वर शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न

NEET Repeater विद्यार्थ्यांसाठी संधी – Aditya Tutorials कडून प्रवेश प्रक्रिया सुरू

‘मी डोळ्यांदेखत मृत्यू पाहिला, कोणीच ऐकलं नाही अन्…’ इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्या योगेशने सांगितला थरार