‘RCB’च्या रॅलीतील चेंगराचेंगरीमधील मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाखांची मदत

आयपीएल ट्रॉफीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(RCB ) संघाने आपलं नाव कोरलंय. याच संघाच्या सत्कारासाठी बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.चिन्नास्वामी स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मात्र गालबोट लागले आहे. या स्टेडियमच्या परिसरात मोठी चेंगराचेंगरी झाली असून तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर जखमी झालेल्या लोकांचा मोफत इलाज केला जाणार आहे.

याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं, या चेंगराचेंगरी बद्दल ऐकून मला दुःख झालं. एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या या चेंगराचेंगरीमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झालाय. तर अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने आनंदावर विरजण पडलं. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो. तर जखमी लोक लवकर बरे होवोत ही प्रार्थना.

दरम्यान या दुर्घटनेनंतर ही चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली? असं विचारलं जात आहे. तसंच, प्रशासन नेमकं कुठं चुकलं याबाबतही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा यंदाच्या आयपीएलमध्ये विजय झाल्यानंतर कर्नाटकमध्ये बंगळुरू(RCB ) येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर या संघातील खेळाडूंची मोठा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याच सत्काराला अपेक्षेपेक्षा जास्त लोक आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला येणाऱ्यांत तरुण मोठ्या प्रमाणावर होते. लोकांनी स्टेडियम पूर्ण भरल्यामुळे बाहेरच्या चाहत्यांना आत सोडले जात नव्हते. त्यामुळे मैदानाच्या बाहेर लोकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. पुढे हीच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार या स्टेडियममध्ये एका वेळी 40 हजार प्रेक्षक बसू शकतात. पण प्रत्यक्षात मात्र या कार्यक्रमाला तब्बल 5 लाख लोक जमा झाले होते. याचाच अंदाज आयोजकांना आला नसल्याचा आरोप आता केला जात आहे. दुसरीकडे अपेक्षेपेक्षा जास्त लोक येतील हा अंदाज न आलेला नसल्यामुळे येथे पोलिसांचा फौजफाटादेखील कमी होता. मिळालेल्या माहितीनुसार पाच लाख लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त 10 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळेच गर्दी नियंत्रित करता आली नाही. परिणामी पुढच्याच काही वेळेत मोठी चेंगराचेंगरी झाली आणि तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला.

दुसरीकडे अपेक्षेपेक्षा जास्त लोक येतील हा अंदाज न आलेला नसल्यामुळे येथे पोलिसांचा फौजफाटादेखील कमी होता. मिळालेल्या माहितीनुसार पाच लाख लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त 10 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळेच गर्दी नियंत्रित करता आली नाही. परिणामी पुढच्याच काही वेळेत मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 लोक यात जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :