रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा व्यक्त करणारा महत्त्वाचा सण आहे. श्रावण पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या उत्सवावर यंदा 28 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणामुळे ग्रहणाचे सावट असल्याची चर्चा आहे. (Raksha Bandhan) त्यामुळे राखी बांधताना सूतक पाळावे लागेल का, ग्रहणाचा परिणाम होईल का आणि कोणता मुहूर्त योग्य ठरेल, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

पंचांगानुसार, यंदा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन एकाच दिवशी म्हणजे 28 ऑगस्ट 2026 रोजी येणार आहे. याच दिवशी चंद्रग्रहण होणार असून त्याची सुरुवात सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी होईल. हे ग्रहण दुपारी 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत राहणार असल्याचे पंचांगात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रहण असल्याने धार्मिक विधींवर त्याचा काही परिणाम होईल का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
मात्र या चंद्रग्रहणाची एक महत्त्वाची बाब म्हणजे ते भारतातून पाहता येणार नाही. धार्मिक मान्यतेनुसार, ज्या ठिकाणी ग्रहण प्रत्यक्ष दिसत नाही, त्या प्रदेशात ग्रहणाशी संबंधित सूतक काळ लागू होत नाही, असे मानले जाते. सामान्यतः ग्रहण सुरू होण्याच्या काही तास आधी सूतक सुरू होते आणि ग्रहण संपेपर्यंत ते पाळले जाते. (Raksha Bandhan) परंतु भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे येथील नागरिकांना ग्रहणदोषाचा सामना करावा लागणार नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पारंपरिक उत्सवात ग्रहणामुळे अडथळा निर्माण होणार नसल्याचे या माहितीतून स्पष्ट होते.
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधताना शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व दिले जाते. 28 ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी एकापेक्षा अधिक शुभ वेळा उपलब्ध असल्याचे पंचांगानुसार सांगितले जाते. यातील पहिला आणि सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 6 वाजून 23 मिनिटांपासून 9 वाजून 47 मिनिटांपर्यंत आहे. या कालावधीत बहिणींना भावाच्या मनगटावर राखी बांधता येऊ शकते.
याशिवाय दुपारी 12 वाजून 14 मिनिटांपासून 1 वाजून 5 मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी 6 वाजून 57 मिनिटांपासून 7 वाजून 19 मिनिटांपर्यंतची संधिप्रकाशाची वेळही शुभ मानली जाते. (Raksha Bandhan) त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरे करणाऱ्यांकडे राखी बांधण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. चंद्रग्रहण भारतातून दिसत नसल्यामुळे त्याचा धार्मिक परिणाम येथे होणार नसल्याचे सांगितले जात असले तरी ही माहिती सामान्य धार्मिक आणि पंचांगाच्या माहितीनुसार आहे. याची स्वतंत्र पुष्टी करण्यात आलेली नाही.
हेही वाचा :
धीरज परदेशीची भगव्या टिळ्यामुळे हत्या का? संग्राम जगताप यांच्या मागण्या काय?
तुम्ही नालायक गृहमंत्री राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण अमित शहांवर संतापले?