कोलंबो कसोटी सामन्यातील विजयाची वाळू टीम इंडियाच्या हातून हळूहळू निसटत आहे. (Sachin Tendulkar) यासाठी श्रीलंकेचा अष्टपैलू सोनल दिनुशा जबाबदार आहे. त्याने दुसऱ्या डावातही टीम इंडियाला झुंजवलं. असं असताना बीसीसीआय अधिकाऱ्याने त्याची थेट तुलना सचिन तेंडुलकरशी केली.

भारत श्रीलंका कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशीचा खेळ पाहता हा सामना आता ड्रॉच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.. कारण श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुशा याने शेवटच्या दिवशीही टीम इंडियाला चांगलंच झुंजवलं. (Sachin Tendulkar) इतकंच काय तर भारताविरुद्ध चारही डावात अर्धशतकी खेळी करून त्याने इतिहास रचला आहे. या कामगिरीसह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. असं असताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सोनलची तुलना थेट सचिन तेंडुलकरसोबत केली. राजीव शुक्ल यांनी कोलंबो कसोटी सुरू असताना केलेल्या पोस्टमुळे आता वादाला फोडणी मिळाली आहे. भारत श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रादरम्यान त्यांनी ट्वीट केलं आणि वाद सुरू झाला. क्रीडाप्रेमी आणि नेटकऱ्यांना थेट सचिनशी केलेली तुलना काही भावली नाही.
राजीव शुक्ला यांनी गुरूवारी कोलंबो कसोटी दरम्याने सोनलवर स्तुतीसुमनं उधळली होती. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘श्रीलंकेचा सोनल एक जबरदस्त खेळाडू आहे. तो सचिनसारखा वाटतो. तो एक चांगला कसोटी खेळाडू होऊ शकतो.’ सोनल दिनुशाची तुलना थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी केल्याने चाहत्यांना राग अनावर झाला आहे.(Sachin Tendulkar) त्यांनी राजीव शुक्ला यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.सोनल दिनुशा याने भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत आपल्या कामगिरीने छाप सोडली आहे. गॉलमध्ये कोसटी शतक ठोकलं होतं. कोलंबोतही त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याने चारही डावात 50हून अधिक धावा करण्याचा विक्रम रचला. 67 वर्षानंतर भारताविरुद्ध अशी कामगिरी पाहायला मिळत आहे. यापूर्वी चारही डावात 1959 साली इंग्लंडच्या केन बॅरिंग्टनने अर्धशतक ठोकलं होतं. तर महेला जयवर्धनेच्या नावावरही हा विक्रम आहे. त्याने 2001 आणि 2005 मध्ये झालेल्या मालिकेत असा विक्रम केला होता. तर तीन फलंदाजांच्या नावार सलग 6 वेळा 50हून अधिक धावा करण्याचा विक्रम आहे. यात वेस्ट इंडिजचा शिवनारायण चंद्रपॉल, झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर आणि ऑस्ट्रेलियाचा ख्रिस रॉजर्स यांच्या नावावर हा विक्रम आहे.
हेही वाचा :
तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?