माणिकराव कोकाटे मोकाट! सरनाईकांची बोलीभाषा जोरात

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : असाही एक काळ होता की, राज्याचे मंत्री भाषा सभ्यता पाळायचे. वादग्रस्त वक्तव्य टाळायचे. जीभ घसरू देत नसत. राजकारणी(political), नेते, मंत्री हे तोलून मापून जपून बोलायचे. एकमेकांवर संयत टीका करायचे. भाषणात आशय आणि विचार असायचा. आता हे सर्व इतिहास जमा झाले आहे. आठवडाभरात एकाही नेत्याने, मंत्र्याने वादग्रस्त टीका टिपणी केली नाही तर सर्वसामान्य जनतेला काहीतरी चुकल्यासारखे वाटते. कृषी मंत्री म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी ही मुंबईची बोलीभाषा असल्याचे सांगून मराठी भाषेला कोपऱ्यात नेऊन बसवले आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी हे त्यांना मिळालेले पैसे लग्न समारंभात उधळतात. शेतीत गुंतवणूक करत नाहीत. पंचनामे झोपलेल्या पिकाचे करायचे की ढेकळाचे करायचे? हल्ली भिकारी सुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांचा पिक विमा काढलेला आहे. अशी काही विधाने त्यांनी गेल्या चार-पाच महिन्यात केली आहेत. ही त्यांनी उधळलेली विधाने ही काही वैचारिक आहेत असे म्हणण्याचे धाडस कोणीही करणार नाही.

ओसाड गावचे पाटील किंवा ओसाड गावची पाटीलकी असे उपरोधाने म्हटले जाते(political). म्हणजे जिथे काही पिकत नाही, जिथून काही मिळत नाही, उगवला तर घायपात उगवतो. अशा ओसाड गावचा पाटील म्हणजे राज्याचा कृषिमंत्री असे माणिकराव कोकाटे यांना म्हणावयाचे आहे. म्हणजे काहीच हाती लागत नाही. अशीच एकूण त्यांची अडचण झालेली दिसते. हे कृषी मंत्री पद अजितदादा यांनी त्यांना मुद्दाम दिलेले आहे असेही त्यांनी म्हटलेले आहे. वास्तविक कृषी मंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि असते. हे खाते कोणी कसे हाताळतो यावर बऱ्याचश्या गोष्टी अवलंबून असतात. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे शेतीवर विलक्षण प्रेम होते. कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्याचे त्यांचे प्रयत्न होते. यापूर्वी ज्यांनी हे खाते सांभाळले, त्यांनी त्या खात्याला कसा न्याय दिला याचा अभ्यास माणिकराव कोकाटे यांनी करायला हवा.

Mumbai News: प्रताप सरनाईक ने छेड़ दी भाषाई बहस, संजय राऊत ने अमित शाह को घसीटा विवाद में… | hindi is our beloved sister shinde faction minister pratap sarnaiks statement created ruckus |

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख पदाधिकारी भैय्याजी जोशी यांनी मुंबईत विभाग वार कोणती भाषा बोलली जाते याचे विवेचन करताना घाटकोपर म्हणजे हिंदी भाषिक पट्टा असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्यावर टीका होऊ लागल्यानंतर खुलासा करताना त्यांची चांगलीच दमछाक झाली होती. पण आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक(political) यांनी मुंबईची बोलीभाषा हिंदी असल्याचा शोध लावून मराठी भाषेला कोपऱ्यात नेऊन बसवले आहे. मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर अशा प्रकारचे वक्तव्य होत असेल तर मात्र”मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे”या वाक्यातील ऊर्जाच निघून जाते.

 

मुंबईत कुठल्यातरी विभागात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे भाषण हिंदीतून झाले. वास्तविक हिंदीतून बोलण्याचा संबंधच नव्हता(political). मुंबईत बोलायचे तर मराठीतच बोलले पाहिजे असे त्यांना वाटले नाही. मराठी ही मातृभाषा आहे आणि हिंदी ही मराठीची लाडकी बहीण आहे असे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली नाही तरच नवल!

UCN News Live | Live News in Nagpur | Vidharbha News

भाषावार प्रांत रचना जी झाली आहे ती तेथील मातृभाषेवर आधारित आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी(political) ही मातृभाषा असल्यामुळे, तिचा सन्मानच केला पाहिजे. पण सरनाईक यांनी मुंबईची बोली भाषा ही हिंदी असल्याचा जावई शोध लावला आहे. आपण काय बोलत आहोत? त्याचे परिणाम काय होणार आहेत? याचा विचार करून बोलले पाहिजे. तथापि आपण फार सैद्धांतिक, बोलत आहोत अशा अविर्भावात कोणी बोलू नये. बोलायचेच असेल तर अभ्यास करून बोलावे. आपल्या बोलण्याने सर्वसामान्य जनतेच्या ज्ञानात भर पडली पाहिजे. असा विचार बोलण्यातून पुढे आला पाहिजे. तथापि आपण काय बोलतो आहोत याचेच अनेकांना भान राहत नाही. शेती, शेतकरी आणि मराठी भाषा हे दोन्ही विषय संवेदनशील आहेत. हे संबंधितांनी समजून घेतले पाहिजे.

हेही वाचा :