शरद पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरणार असल्याचे संकेत वर्धापन दिनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे(political). सुरूवातीला जयंत पाटलांनी त्यांच्या भाषणाची दमदार सुरूवात केली. यावेळी त्यांनी ‘अभी भी पवार साहब का डर बाकी है’ असे म्हणत सत्ताधाऱ्यांना टप्प्यात घेतले.
मात्र, भाषणाच्या शेवटी पाटलांनी पवार साहेबांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असे म्हणत अध्यक्षपदाच्या(political) राजीनाम्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात पवारांच्या राष्ट्रवादीत भाकरी फिरणार का? आणि अध्यक्षपदाची संधी कुणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे. पक्ष २७ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
देशपातळीवर या पक्षानं मोठ योगदान दिल्याचे जयंत पाटील म्हणाले. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून देश संकटात तेव्हा एक व्हायच असत अस पवारांनी सांगितले असे म्हणत जयंत पाटलांनी ऑपरेशन सिंधूरबाबत जगभरात पाठवलेल्या शिष्टमंडळवर भाष्य केले. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ गेलं त्यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडल्याचेही जयंत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांचं मोठं वक्तव्य, शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली पद सोडण्याची इच्छा #JayantPatil #SharadPawar #NCP @Jayant_R_Patil @PawarSpeaks @supriya_sule @RRPSpeaks @NCPspeaks @AjitPawarSpeaks pic.twitter.com/3m3AfZcnDr
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) June 10, 2025
आम्ही तुकाराम महाराज यांच्या विचारांचे आहोत. तुकाराम महाराज यांनी सांगितले की, भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी, यामुळे या पुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे. ही लढाई तुकाराम vs नथुराम आहे. पुढे रस्त्यावर उतरणार आहोत. पराभवाची चर्चा करू नका, असे जयंत पाटील म्हणाले.
उपस्थितांना संबोधित करताना जयंत पाटलांनी(political) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही सडकून टीका केली. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत निराशा झाली समोर विजय दिसत असतांना निकाल वेगळा लागला असे म्हणत निवडणूक संशयास्पद होती.
निवडणूक आयोगापेक्षा इतरच लोक स्पष्टीकरण देत असल्याचेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत ८५ मतदार संघात महायुती हरली तिथे निकाल वेगळे लागले. उत्तम जानकर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशी मागणी केली जात होती मात्र त्यांच्यावरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अस बोलल गेलं.
८ बहाद्दर निवडून आले ९ आले असते मात्र ट्राम्पेटमुळे एक जागा गेल्याचे जयंत पाटील म्हणाले. काही ठिकाणी चिन्हाचा फटका बसला. निवडणुकीत(political) मनी अन मसालचा वापर झाला हे वेगळ सांगायला नको. OBC आरक्षण मुद्द्यावरून पवारांवर नाहक टीका केली जाते. obc हितासाठी पवारांनी नेहमी प्रयत्न केले. देशात मंडल लागू करणारा पहिला मुख्यमंत्री पवार होते. न्यायाधीशाकडे पैसे सापडले मात्र कारवाई काहीच झाली नाही.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीरात भाषणाच्या शेवटी जयंत पाटलांनी कार्यमुक्त करण्याचे संकेत दिले. त्याचवेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. नव्यांना संधी द्या असं म्हणताच कार्यकर्ते नाही नाही म्हणत उठले. त्यावेळी जयंत पाटलांनी शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला बरेच पुढे जायचे आहे असे म्हणत भाषण थांबवले.
हेही वाचा :