इचलकरंजी – कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे श्रध्दा अकॅडमीचे(Academy) रजिस्ट्रेशन तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र कामगार सेनेनं एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

इचलकरंजी शहरातील नामांकित समजल्या जाणाऱ्या श्रध्दा अकॅडमीमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा व इतर जिल्ह्यांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेतात. मात्र, स्थानिक विद्यार्थी आणि कामगार वर्गातील मुलांना येथे प्रवेश मिळत नाही, अशी तक्रार कामगार सेनेनं केली आहे.
कामगार वर्ग दिवसभर १२-१२ तास मेहनत करतो. त्याच्या मुलालाही उच्चशिक्षण घ्यावं, हे त्याचं स्वप्न असतं. परंतु, श्रध्दा अकॅडमीत भरमसाठ फीमुळे त्यांना प्रवेश मिळणं कठीण झालं आहे. एवढंच नाही, तर ७० ते ८० टक्के गुण मिळवलेले विद्यार्थीही प्रवेशापासून वंचित राहत आहेत, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या अकॅडमीत(Academy) प्रवेश प्रक्रियेपेक्षा व्यवसायिक दृष्टिकोन अधिक असल्याचं सांगत, येथे मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असून विद्यार्थ्यांकडून फक्त पैसे उकळले जातात, असा आरोपही कामगार सेनेनं केला आहे.
यासंदर्भात संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हाध्यक्ष केंपान्ना हालगेकर, महिला जिल्हाध्यक्षा बेगम नदाफ, शाहीन खानापूरे, सुवर्णा शिंदे, प्रियांका पाटील आणि सलीम खानापूरे यांच्या स्वाक्षरी असलेलं निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. या मागणीची दखल प्रशासन घेतो का, आणि अकॅडमीविरोधात काही ठोस कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
मी आणि माझा बबड्या…; शिंदेंच्या मेळाव्यानंतर मनसेने डिवचलं
आवडत्या महिलेसोबत लग्न करुनही पुरुष का करतात Extra Marital Affair?
कोल्हापूरात पतीसोबत भांडण पत्नी लेकरांसह घरातून निघाली अन्, तळ्यात मारलेली उडी ठरली अखेरची…