राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारकडून तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून सुमारे 36 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती देत शेतकऱ्यांना पेरणी आणि पावसाबाबतही सावधगिरीचा सल्ला दिला.

कर्जमाफीसोबत पेरणीबाबत महत्त्वाचा सल्ला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे. हा निर्णय शेतकरी वर्गासाठी मोठा आधार ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांना 12 ते 15 जूनदरम्यानच्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पेरणी करण्याचे आवाहन केले. विशेषतः मराठवाडा आणि खानदेश परिसरात सर्वत्र एकाच वेळी पाऊस होणार नाही, (farmers) त्यामुळे घाई न करता हवामानाची स्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
मे आणि जून महिन्यात अनेक भागांत वादळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. जळगाव , अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पिकांचे अधिक नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील 24 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून सुमारे 1 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. (farmers) अनेक घरांचेही नुकसान झाले असून प्रशासनाला तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रभावित नागरिकांना लवकर मदत देता येईल.
खतटंचाई, कांदा उत्पादक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य युरिया खताच्या उपलब्धतेबाबत बोलताना दत्तात्रय भरणे यांनी राज्यात सध्या पुरेसा साठा असल्याचे सांगितले. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे काही अडचणी निर्माण झाल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आवश्यक मागणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पेट्रोल-डिझेलप्रमाणे खतांची टंचाई निर्माण होऊ नये, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. (farmers) तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कर्जमाफीसंदर्भातील अटींमध्ये आवश्यक बदल करण्याची गरज भासल्यास सरकार त्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असेही त्यांनी म्हटले. राज्याची आर्थिक परिस्थिती आव्हानात्मक असतानाही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय बच्चू कडू यांनी केलेल्या हमीभावाच्या मागणीशी सरकार सहमत असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
रिमझिमल्या जलधारा ! मुसळधार पावसाचा उद्यासाठी ‘यलो अलर्ट’