देशातील कोट्यवधी आधार कार्डधारकांसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक अत्यंत दिलासादायक घोषणा केली आहे. (Aadhaar card) डिजिटल सेवांचा वापर वाढवण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी १ जुलै २०२६ पासून आधार कार्डशी संबंधित एका महत्त्वाच्या सेवेवरील शुल्क तात्पुरते पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.

शुल्कमाफी आणि घरबसल्या मोबाईलद्वारे सुलभ प्रक्रिया आतापर्यंत आधार कार्डमध्ये आपला ईमेल पत्ता जोडण्यासाठी किंवा आधीचा जुना ईमेल बदलण्यासाठी ग्राहकांना ₹७५ इतके शुल्क मोजावे लागत होते. मात्र, च्या नवीन धोरणानुसार, ही सेवा १ जुलै २०२६ ते डिसेंबर २०२६ या पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी १००% मोफत करण्यात आली आहे.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आता कोणत्याही आधार केंद्रावर जाऊन लांबच लांब रांगेत उभे राहण्याची अजिबात गरज नाही. UIDAI ने ही पूर्ण प्रक्रिया त्यांच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून दिली आहे. नागरिक अत्यंत सोप्या पद्धतीने स्वतःच्या मोबाईलवरून काही मिनिटांतच आपला नवीन ईमेल पत्ता नोंदवू शकतात, (Aadhaar card) ज्यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहे.
ईमेल आयडी लिंक करण्याचे ३ मुख्य फायदे आणि उद्दिष्ट केवळ मोबाईल नंबर लिंक असणे पुरेसे नसून, आधार सुरक्षित ठेवण्यासाठी ईमेल आयडी जोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. UIDAI ने घेतलेल्या या निर्णयामागे खालील प्रमुख फायदे आहेत: भक्कम बॅकअप पर्याय: अनेकदा मोबाईल नेटवर्क नसताना किंवा मोबाईल नंबर गहाळ/बदलल्यास, सुरक्षिततेसाठी ईमेल आयडी हा सर्वोत्तम बॅकअप म्हणून काम करतो. त्वरित अधिकृत अलर्ट: तुमचे आधार कार्ड कुठे आणि केव्हा वापरले गेले, किंवा त्यात काही अंतर्गत बदल केले गेले आहेत का, याची प्रत्येक लहान-मोठी माहिती थेट तुमच्या ईमेलवर त्वरित पाठवली जाते, (Aadhaar card) ज्यामुळे फसवणुकीला आळा बसतो. सुलभ ऑनलाइन केवायसी: ईमेल जोडल्यामुळे डिजीलॉकर तसेच इतर सर्व सरकारी आणि वित्तीय पोर्टल्सवर लॉग इन करणे आणि ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत जलद व सोपे होते.
हेही वाचा :
समशितोष्ण कोल्हापूरमध्ये हरवत चाललेय ऋतुचक्र?