महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा भरती प्रक्रियेत मोठा बदल करत पदसंख्येत लक्षणीय वाढ जाहीर केली आहे. (examinations) त्यामुळे अनेक उमेदवारांना शासकीय सेवेत प्रवेश मिळवण्याची संधी अधिक व्यापक झाली आहे.

पदसंख्या थेट तिप्पट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) प्रसिद्ध केलेल्या सुधारित अधिसूचनेनुसार राज्यसेवा परीक्षेतील रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. याआधी या भरतीसाठी 87 पदांची घोषणा करण्यात आली होती. मात्र नव्या निर्णयानुसार आता एकूण 265 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आयोगाने ही माहिती आपल्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनही जाहीर केली आहे. मर्यादित पदसंख्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. राज्यभरातील अभ्यासिका, वाचनालये आणि स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये या विषयावर चर्चा सुरू होती. (examinations) अनेक महिन्यांपासून कठोर परिश्रम घेणाऱ्या उमेदवारांनी पदवाढीची मागणी केली होती. अखेर आयोगाच्या या निर्णयामुळे परीक्षार्थींमध्ये नव्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
सुधारित पदसंख्येत राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या गट-अ आणि गट-ब पदांचा समावेश करण्यात आला आहे. विशेषतः पोलीस उपअधीक्षक या पदाचा समावेश झाल्याने पोलीस सेवेत जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण विकास क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी गटविकास अधिकारी पदांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती महत्त्वाची ठरणार आहे. मात्र पदसंख्या वाढूनही प्रशासनातील अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे उपजिल्हाधिकारी पद या वाढीव जागांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही. (examinations) त्यामुळे काही उमेदवारांमध्ये याबाबत चर्चा सुरू असली तरी एकूण 87 वरून 265 पदांपर्यंत झालेली वाढ ही मोठी संधी म्हणून पाहिली जात आहे. प्रवर्गनिहाय पदांचा तपशील आणि इतर आवश्यक माहिती उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून आता या भरती प्रक्रियेकडे संपूर्ण राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
समशितोष्ण कोल्हापूरमध्ये हरवत चाललेय ऋतुचक्र?