संजू सॅमसनच्या अडचणीत वाढ ३ खेळाडूंना संघातून डच्चू मिळण्याची शक्यता?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे निकालाविना संपला असला, तरी काही भारतीय खेळाडूंच्या कामगिरीने संघ व्यवस्थापनाची चिंता वाढवली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 बाद 189 धावा उभारल्या. कर्णधार श्रेयस अय्यर आणि अभिषेक शर्मा यांनी अर्धशतके झळकावली, तर शिवम दुबे याने 21 चेंडूत नाबाद 42 धावांची आक्रमक खेळी केली. (players) मात्र काही प्रमुख फलंदाजांच्या अपयशामुळे त्यांच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

युनायटेड किंगडम दौऱ्यात संजू सॅमसन सातत्याने धावा करण्यात अपयशी ठरत आहे. यापूर्वी आयर्लंड (Ireland) विरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात तो लवकर बाद झाला. सलग अपयशामुळे त्याच्या संघातील स्थानावर दबाव वाढला असून, पुढील सामन्यांतही कामगिरी सुधारली नाही तर संघ व्यवस्थापन बदलाचा विचार करू शकते.ईशान किशन याच्याही कामगिरीने निराशा केली आहे. आयसीसी (ICC) टी-20 क्रमवारीतील अव्वल फलंदाजांपैकी एक असलेल्या ईशानने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत केवळ 1 आणि 12 धावा केल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खातेही न उघडता बाद झाला. विशेष म्हणजे, त्याच्या मागील तीन डावांपैकी दोन वेळा तो धावबाद झाला आहे. (players) त्यामुळे त्याच्यावरील दबाव आणखी वाढला असून आगामी सामन्यांतील कामगिरी त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

भारतीय संघाचा उपकर्णधार तिलक वर्मा धावा करत असला तरी त्याच्या फलंदाजीच्या गतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पाचव्या क्रमांकावर खेळताना त्याने मागील तीन डावांत अनुक्रमे 19 (21), 55 (46) आणि 13 (13) धावा केल्या आहेत. या क्रमांकावरील फलंदाजाकडून वेगवान धावगतीची अपेक्षा असते, मात्र तिलक अद्याप त्या भूमिकेत अपेक्षित प्रभाव पाडू शकलेला नाही. (players) त्यामुळे त्याच्या उपकर्णधारपदासह संघातील भूमिकेवरही चर्चा सुरू झाली आहे.संघ व्यवस्थापन ईशान किशन आणि तिलक वर्मा यांना या मालिकेत आणखी काही संधी देण्याची शक्यता आहे. मात्र खराब फॉर्म कायम राहिल्यास बदल अटळ ठरू शकतो. दुसरीकडे, संजू सॅमसनसाठी परिस्थिती अधिक कठीण मानली जात असून, त्याच्या जागेसाठी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या प्रतीक्षेत असल्याची चर्चा रंगत आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींचं बँक खातं होणार फुल्ल? आता थेट 3000 रुपये?

पुणे-नाशिककरांनो रेल्वे संदर्भात अत्यंत महत्वाची बातमी?

WhatsApp वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी महत्त्वाच्या फीचरबाबत केंद्र सरकार अलर्ट?