महाराष्ट्र राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केले असून, मुंबई आणि लगतच्या परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या तात्काळ इशाऱ्यानुसार, मुंबई शहर, उपनगरे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (rains)अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने नागरिकांना केवळ तातडीच्या कामासाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

सखल भागांत पाणी साचले; अंधेरी सबवे बंद आणि रेल्वे सेवा संथ सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल परिसरांना पाण्याचा वेढा पडला आहे. विशेषतः अंधेरी येथील भुयारी मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तो वाहतुकीसाठी तात्काळ बंद करण्यात आला आहे. पाण्याचा निचरा झाल्यानंतरच हा मार्ग पुन्हा खुला केला जाईल. दक्षिण मुंबई भागातही पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. (rains) याशिवाय, मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल रेल्वे सेवाही पावसामुळे विस्कळीत झाली असून, गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. वांद्रे येथील कलानगर परिसरातही रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे.
ठाण्यात पावसाची संततधार आणि कोकणात पूरसदृश परिस्थिती मुंबई शेजारील ठाणे शहरातही पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, रात्री १२ वाजेपासून २६ मिमी तर संपूर्ण दिवसात एकूण ८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाण्यात आज दिवसभर हीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कोकण (Konkan) किनारपट्टीवर पावसाने धुमाकूळ घातला असून, रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यालाही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. संपूर्ण राज्यातच पावसाचा जोर वाढत असून, पुढील चार दिवस अत्यंत महत्त्वाचे (rains) आणि खबरदारीचे राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो कर्जमाफी यादीत नाव कसं तपासाल?