बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडवर, आता कारवाई होणार, इंग्लंडविरुद्ध खराब कामगिरी केल्यामुळे थेट संघाचा?

भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चौथा सामना आज रंगणार आहे, (India and England) आता या मालिकेत एका खेळाडूची कामगिरी अतिशय वाईट पाहायला मिळाली. आता त्याला संघातून वगळले जाण्याची शक्याता नाकारता येत नाही.

2023 पासून, पाकिस्तान क्रिकेटमध्ये कर्णधार बदलले जात आहेत. पीसीबीने एकदिवसीय आणि टी-20 कर्णधार अनेक वेळा बदलले आहेत. 2023 मध्ये, शान मसूदने बाबर आझमची जागा कसोटी कर्णधार म्हणून घेतली. (India and England) त्याची जागा पुन्हा एकदा बाबरने घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघाला उपकर्णधारांच्या बाबतीत अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. टी-20 आणि कसोटी क्रिकेट या दोन्हीमध्ये उपकर्णधार वारंवार बदलले जात आहेत. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला, अक्षर पटेलची भारतीय टी-20 संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. आशिया कपपूर्वी अक्षरला हटवण्यात आले आणि शुभमन गिलने ही भूमिका स्वीकारली. टी-20 विश्वचषकापूर्वी गिलला संघातून वगळण्यात आले आणि अक्षर उपकर्णधार म्हणून परतला. भारताने विजेतेपद पटकावले आणि त्या विजयात अक्षरने महत्त्वाची भूमिका बजावली. विश्वचषकानंतर अक्षर संघातच राहिला, पण तिलक वर्माने त्याची जागा उपकर्णधार म्हणून घेतली.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिलक वर्माचा फॉर्म बऱ्याच काळापासून खराब आहे. तिलकची आवडती फलंदाजीची जागा त्याच्या हातून निसटली आहे. त्याने तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर ३४ डावांमध्ये 1039 धावा केल्या आहेत. तिलक पाचव्या क्रमांकावर खेळत असून, नऊ डावांमध्ये त्याने केवळ 224 धावा केल्या आहेत. तो फिनिशरच्या भूमिकेत बसत नाही. पहिल्या चार क्रमांकांमध्ये कोणतीही जागा रिक्त नाही. परिणामी, तिलकला संघात आपले स्थान टिकवून ठेवणे कठीण वाटत आहे. फिरकी गोलंदाजीविरुद्धची त्याची कमजोरीही जगासमोर स्पष्ट झाली आहे. त्याला अंतिम 11 खेळाडूंमधून काढून टाकण्याची मागणी होत आहे.

2026 मध्ये, तिलक वर्माने भारतासाठी 14 सामन्यांमध्ये केवळ 321 धावा केल्या. त्याची सरासरी 29 आणि स्ट्राइक रेट 136 असून, (India and England) त्यात फक्त एका अर्धशतकाचा समावेश आहे. टी20 विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर अपयशी ठरल्यानंतर, त्याला पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर ढकलण्यात आले.कसोटी सामन्यांमध्येही उपकर्णधार बदलत आहेत. जसप्रीत बुमराह गेल्या वर्षीच्या सुरुवातीपर्यंत भारताचा कसोटी उपकर्णधार होता. इंग्लंड दौऱ्यासाठी शुभमन गिलने कर्णधारपद स्वीकारले आणि ऋषभ पंतची कसोटी उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही कर्णधारपद भूषवले होते, परंतु त्याला या पदावरून हटवण्यात आले आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी केएल राहुलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा :

कमी वयात केस पांढरे होतायेत? 5 कारणे ठरू शकतात जबाबदार?

क्रिकेट विश्वात खळबळ इंग्लंड पराभवानंतर गंभीरसमोर ‘संजू’च्या घोषणा?

पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान?