अशोक चव्हाण, संग्राम थोपटे आदी काँग्रेसशी प्रामाणिक घराण्यांनी पक्षाची साथ सोडलेली असताना (leader)आता खान्देशातही भाजप मोठा हादरा देण्याची शक्यता आहे. खान्देशातील काँग्रेसचा चेहरा असलेले माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपच्या संपर्कात आहेत. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे वृत्त आहे.कुणाल पाटील हे काँग्रेसचे दिवंगत नेते रोहिदास उर्फ दाजीसाहेब पाटील यांचे सुपुत्र… खान्देशच्या विकासाचे स्वप्न पाहिलेले आणि ते सत्यात उतरविण्यासाठी आयुष्यभर धडपडलेले आणि त्याचमुळे गांधी घराण्याचे विश्वासू नेते अशी दाजीसाहेब पाटील यांची ओळख.

दाजींनी काँग्रेसशी असलेली नाळ तुटू दिली नाही. कुणाल पाटील यांच्या रूपाने त्यांची तिसरी पिढी काँग्रेसमध्ये आहे. पंडित नेहरू ते राहुल गांधींपर्यंत पाटील घराणे नेहरू-गांधी कुटुंबाशी सदैव एकनिष्ठ राहिले. मात्र त्यांची पुढची पिढी राजकारणातील भविष्याच्या संधी हेरून पक्षबदल करण्याच्या मानसिकतेत आहे.(leader)कुणाल पाटील यांनी रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली, पक्षप्रवेशावर चर्चा झाल्याची माहिती
काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपच्या संपर्कात आहेत. कुणाल पाटील यांनी ‘रायगड’ या निवासस्थानी भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली. या भेटीत पक्षप्रवेसंबंधी चर्चा झाल्याची माहिती आहे. कुणाल पाटील हे लवकरच भाजपात प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची तूर्त माहिती मिळत आहे.(leader)भाजपचे धक्कातंत्र सुरूचमुंबई महापालिका निवडणुकीसह इतरही महत्त्वाच्या महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्याने प्रवेशासाठी इतर पक्षातील नेत्यांचा भाजपकडे ओढा असल्याचे दिसते.
नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर, अशोक मुर्तडक आदी मंडळींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपचे धक्का तंत्र सुरुच असून आता पाटील घराण्याच्या रुपात काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत भारतीय जनता पक्ष आहे.कुणाल रोहिदास पाटीलहे खान्देशचे मोठे नेते आहेत. खान्देश काँग्रेसचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. दाजीसाहेबांसारखा मोठा वारसा असल्याने त्यांना सुरुवातीलाच राजकारणात यश मिळाले. काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्राच्या तेराव्या आणि चौदाव्या विधानसभेवर ते निवडून गेले होते. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून ते पक्षात एकटे पडल्याची चर्चा आहे. त्याच अस्वस्थतेतून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे कळते.
हेही वाचा :
इस्रायल/इराण युद्धात, आता अमेरिका उतरली
Rishabh Pant अडचणीत! पंचांशी वाद पडेल महागात, लागणार बॅन?
विजय देवरकोंडाच्या अडचणीत वाढ, SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?