कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : आपल्या देशात राजकारण(politics) हे असे एकमेव क्षेत्र आहे की, तिथे निवृत्तीचे वय ठरलेले नाही. “अवघे पाऊणशेहे वयोमान”हे या क्षेत्रात ज्येष्ठ म्हणून मिरवले जाते. मार्गदर्शकाच्या भूमिकेत आता वावरावे असे इथे कोणाही राजकारण्याला वाटत नाही. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्याला प्रोत्साहन देऊन नवीन नेतृत्व उभे करावे असा विचार इथे कोणी करत नाही. बुलेट नवीन नेतृत्व आपल्याच घरातले असले पाहिजे अशीच मानसिकता सर्वत्र दिसते.

कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही प्रस्थापित राजकारण्याने(politics), त्याच्या जवळच्या कार्यकर्त्याला संधी दिली आहे असे उदाहरण शोधूनही सापडत नाही. त्यामुळे अजितदादा पवार यांनी आवाहन करूनही माजी आमदार के. पी. पाटील हे राजकारणातून निवृत्त होतील असे वाटत नाही. विधानसभा निवडणुकीत पराभवाची हॅट्रिक होऊनही एकाच वर्षात पक्ष बदलण्याची त्यांनी हॅट्रिक साधली आहे.
दूधगंगा वेदगंगा अर्थात बिद्री सहकारी साखर कारखान्याला उसाची वाहतूक करणारे सामान्य ट्रकचालक असलेले के. पी. पाटील हे त्याच बिजली साखर चे चेअरमन आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात(politics) तीन पक्ष एकत्र येऊन महायुती अस्तित्वात आल्यानंतर अनेकांच्या राजकीय महत्त्व का ज्यांना सुरुंग लागला. त्यात के पी पाटील हे सुद्धा अपवाद नव्हते. शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश अबिटकर यांची विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रिक होऊ द्यायची नाही म्हणून राष्ट्रवादीच्या अजितदादा गटातून शरद पवार यांच्या गटात आणि तेथूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेलेल्या के पी पाटील यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.
इसवी सन 2024 ची विधानसभा निवडणुक कोणत्याही स्थितीत लढवायचीच म्हणून राजकीय नाईलाज म्हणून के पी पाटील हे ठाकरे गटात गेले. उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या निवडणूक प्रचाराची सुरुवातच राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून केली. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नेते काँग्रेसचे सतेज पाटील यांच्यावर सोपवली होती. पण के पी पाटील हे सलग तिसऱ्यांदा पराभूत झाले.
ठाकरे गटात जाऊन जेमतेम चार महिने झालेल्या के पी पाटील यांचा तिथे जीव रमला नाही. म्हणून मग पुन्हा ते अजितदादा पवार यांच्या गटात जात आहेत. पण अजितदादा यांनी त्यांना आता राजकारणातून(politics) निवृत्ती घ्या, 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत तुमचे वय 84 होईल. आता तुमचे वय झाले आहे. नवीन नेतृत्व तयार करा. असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यात केले.

राजकारणात निवृत्तीचे वय ठरलेले नाही. हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समस्त राजकारण्यांना स्वतःच्या कृतीतून सुचित केले आहे. कारण ते स्वतःच वयाच्या 85 मध्ये सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत. प्रदीर्घकाळ राजकारणात व्यस्त असलेल्या शरद पवार यांनी पवार घराण्यातील अनेकांना राजकारणात आणून प्रस्थापित केलेले आहे. आपल्या राजकीय वारसदार म्हणून त्यांनी सुप्रिया सुळे यांनाच पुढे आणले आहे.
त्यांचाच आदर्श के पी पाटील यांनी घेतलेला दिसतो. म्हणून ते राजकारणातून(politics) निवृत्त होण्याचा विचार करताना दिसत नाहीत. मात्र त्यांनी आपल्या जवळच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्याला नवे नेतृत्व म्हणून पुढे आणावे असा विचार केलेला नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी स्वतःच्या चिरंजीवांनाच संचालक केले आहे. नवीन नेतृत्व तयार करावयाचे असेल तर ते आपल्याच घरातील का असू नये असा व्यावहारिक विचार त्यांनी केलेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच प्रस्थापित राजकारण्यांनी आपल्या नंतर कोण या प्रश्नाचे उत्तर स्वतःच्या घरातच शोधले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळ संघ, सहकारी साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा नियोजन मंडळ, विकास महामंडळ, इथे आपल्याच घरातील सदस्याची वर्णी लावलेली आहे. लाभक्षेत्रातील संस्थांवर आपल्या जवळचा कार्यकर्ता या मंडळींनी दिलेला दिसत नाही. के पी पाटील हे या जिल्ह्यातील राजकारण्यांमध्ये वयाने ज्येष्ठ आहेत. अजित दादा पवार यांनी आवाहन करूनही ते राजकारणातून निवृत्त होतील असे दिसत नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात वयाची साठी उलटून गेलेले बहुतांशी नेते आहेत. अजित दादा पवार हे सुद्धा वयाने ज्येष्ठ आहेत. भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांनी त्यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. पण हे एकमेव उदाहरण आहे. शासकीय, निमशासकीय, सहकारी, वगैरे ठिकाणी निवृत्तीचे वय 58 करण्यात आले आहे. सहकारी बँकांमध्ये निवृत्तीचे वय 55 निश्चित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसाठी निवृत्तीचे वय 65 आहे तर भारतीय लष्कराच्या सेना अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय 65 इतके आहे. अपवाद फक्त राजकारण्यांचा आहे.
हेही वाचा :
भारताचा पाकवर आणखी एक स्ट्राइक; पाकिस्तान सोबतचे सर्व व्यापार बंद करण्याचा निर्णय
महाराष्ट्राला पुन्हा पाऊस झोडपणार; तर या भागांमध्ये तापमान प्रचंड वाढणार, जाणून घ्या हवामान अंदाज
मासिक पाळीत स्वयंपाक केल्याने छळ; सूनेने उचललं भयंकर पाऊल, सासू अन् नणंदेने…