ठाकरेंनंतर आता शरद पवार गटात हालचालींना वेग, नेमकं काय सुरुय?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध घडामोडींना वेग आला असून, शिवसेनेतील बदलांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातही अंतर्गत चर्चांना उधाण आल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, (politics) पक्षात भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत दोन वेगवेगळे मतप्रवाह तयार झाल्याची चर्चा आहे.

एका गटाकडून पक्षाने काँग्रेससोबत विलिनीकरणाचा पर्याय विचारात घ्यावा, अशी भूमिका मांडली जात असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरा गट राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबत जाण्याच्या पर्यायावर चर्चा करण्याच्या बाजूने असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, काही नेत्यांचे मत आहे की विरोधी पक्षात राहिल्यामुळे मतदारसंघांतील विकासकामे आणि निधी मिळवताना अडचणी येत आहेत. (politics) त्यामुळे सत्ताधारी आघाडीसोबत जाण्याचा पर्याय विचारात घ्यावा, अशी भूमिका पक्षातील काही नेत्यांकडून मांडली जात असल्याचे सांगितले जाते.

दुसरीकडे, काही नेत्यांचे मत पक्षाने महाविकास आघाडीतील भूमिका कायम ठेवत काँग्रेससोबत अधिक जवळीक साधावी, असे असल्याची चर्चा आहे.या चर्चांबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेतृत्व काय घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.दरम्यान, पक्षातील काही आमदार भविष्यात वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशा चर्चाही सुरू आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांनी पक्ष एकसंध असल्याचा दावा करत कोणताही आमदार पक्ष सोडणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.अधिकृत घोषणा अद्याप नाही सध्या काँग्रेसमध्ये विलिनीकरण किंवा NDAमध्ये सहभागी होण्याबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. (politics) त्यामुळे या संदर्भातील सर्व चर्चा या सूत्रांच्या माहितीनुसार आणि राजकीय वर्तुळातील चर्चांवर आधारित आहेत. आगामी काळात पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच पुढील चित्र समोर येईल.

हेही वाचा :

मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!

महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?

Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?