माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत(political updates) लिखित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या पुस्तकातून त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहे. अनेक नेते या निमित्ताने जुने संदर्भ पुन्हा उकरून काढत आहेत.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक मोठा आणि खळबळजनक खुलासा केला आहे. गोधरा हत्याकांडाच्या काळात नरेंद्र मोदी यांना भाजपातून बाहेर काढण्याचा निर्णय झाला होता, असा गौप्यस्फोट खैरे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या चर्चांना आणि राजकीय घडामोडींना उधाण येण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले, “गोधरा हत्याकांड घडलं त्यावेळच्या घडामोडी आजही मला आठवतात. गोधरा हत्याकांडाच्या त्या घटनेनंतर लोकसभेत मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी यांना भाजपामधून काढण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी(political updates) मला अहमदाबादला पाठवलं. तिथे मी मोदींना भेटलो आणि त्यांना दिलासा दिला.
‘बाळासाहेब ठाकरेंचा तुमच्यावर पूर्णविश्वास आहे. शिवसेना तुमच्या सोबत आहे.’ त्यावेळी मोदी साहेब म्हणाले की, ‘बाळासाहेब माझ्या सोबत आहेत, हेच माझ्यासाठी खूप आहे. पण आज माझ्याच पक्षातील काही लोक मला पक्षातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.” असं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.

खैरे पुढे म्हणाले, “मोदी यांना भाजपामधून काढण्याचा प्रस्ताव होता, पण बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे तो अडवण्यात आला. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयींनाही तो निर्णय मागे घ्यावा लागला. जर त्या वेळी मोदींना पक्षातून काढलं गेलं असतं, तर आज ते पंतप्रधान झाले असते का? शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संकटातून वाचवलं, पाठिंबा दिला. पण आज दु:ख याचं वाटतं की ज्यांना शिवसेनेनं संकटाच्या वेळी साथ दिली, त्यांनीच आज शिवसेना फोडण्याचं काम केलं,” अशा भावनाही खैरे यांनी व्यक्त केल्या.

“गोधरा हत्याकांडावेळी मी प्रत्यक्ष तिथे जाऊन आलो होतो. तेथील पीडितांच्या घरीही गेलो होतो. आमच्या समोरच बॉम्बस्फोट झाला होता. पोलिसांनी मला सुरक्षा दिली होती, पण तरीही आम्ही घाबरलो नाही. मला याचंच दुःख होतं की, तुम्ही बंडखोरांना बरोबर घेता आणि त्यांच्या मदतीने मूळ शिवसेना फोडत आहात. हे आम्हाला बिलकुल पटलं नाही. म्हणूनच आमचा भाजपावर राग आहे.
त्यांनीच शिवसेना फोडली,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. तसेच, ज्या शिवसेनेच्या पाठिंब्याने तुम्ही सत्तेच्या शिखरावर पोहोचलात, तीच बाळासाहेब ठाकरे यांची अभेद्य शिवसेना तुम्ही फोडली. एकनाथ शिंदे यांनी जी फोडाफोड केली, ती आमच्या मनाला पटलेली नाही,” असंही खैरे यांनी ठामपणे सांगितलं.
हेही वाचा :
‘बॉलिवूडला अंडरवर्ल्डमधूनच…’; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक गौप्यस्फोट
‘तो पेल दुंगा’, अंपायरच्या एका निर्णयानंतर कुलदीप यादवचा थयथयाट
सापाच्या डोळ्यात डोळे घालून बघत होते आजोबा इतक्यात…; VIDEO पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा