काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ माजी मंत्र्याने केला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

सोलापूर : श्रीमंत घराण्यात जन्माला येऊन देखील सिध्दारामजी म्हेत्रे यांच्यात कधीही श्रीमंतीचा दर्प आला नाही. त्यांच्यात अहंकार आला नाही. ते कायम जमिनीवर राहिले. तर अनेक लोक वडिलांच्या नावावर बढाया मारतात, फुशारक्या मारतात, असा सणसणीत टोला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे( political updates) यांनी लगावला. राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

अक्कलकोट येथे आयोजित केलेल्या जाहीरसभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी मंत्री दादा भुसे, मंत्री संजय राठोड, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे उपस्थित होत्या. उपमुख्यमंत्री( political updates) शिंदे म्हणाले की, सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी आहे.

म्हेत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडिल सातलिंग्गपा म्हेत्रे इथलं मोठं प्रस्थ होतं. म्हेत्रे परिवाराने कधी जात धर्म पक्ष पाहिला नाही, आलेल्या माणसाचे काम केले. त्यामुळे इथल्या हिंदु मुस्लिम बांधवांचा म्हेत्रे परिवाराला कायम पाठिंबा राहिला आहे.

तसेच श्रीमंत घराण्यात जन्माला येऊन देखील सिध्दारामजी( political updates) यांच्यात कधीही अहंकार आला नाही. अनेक लोक वडिलांच्या नावावर फुशारक्या मारतात. मात्र, सिध्दारामजी यांनी कधीही बढाया मारल्या नाहीत, ते कायम जमिनीवर राहिले. कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

गुरुवारी सिध्दारामजी यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. जिथे दिशा नाही तिथे दशा झाली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसवर केली. सिध्दाराम म्हेत्रे अनुभवी आहेत. त्यांच्या नावात राम आहे. ते शिवसेनेत आल्याने आता सोलापूर, अक्कलकोट, दुधनीचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड झाली, तेव्हा आम्ही सत्ता सोडली आणि राज्याने एक मोठा उठाव पाहिला. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही ते पाऊल उचलले. केवळ भारताच नव्हे तर जगातील ३३ देशांनी या उठावाची दखल घेतली. जनतेनेही या उठावाला प्रतिसाद दिला. आज शिवसेनेचे ६० आमदार आहेत. एक दिवस असा येईल की विरोधकांचे सगळे तंबू रिकामे होतील, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

हेही वाचा :