कॅमेऱ्यात कैद झाला भारताचा काउंटर अटॅक; पाकिस्तानचे दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त

श्रीनगर: पहलगाम हल्ल्यानंतर(attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेले आहेत. युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानमध्ये घुसून भारत कारवाई करत आहे. दरम्यान पाकिस्तान सीमेवर जोरदार गोळीबार करत आहेत. आता भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी बेस कॅम्प उद्ध्वस्त केला आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला(attack) भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. यामध्ये भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी बेस कॅम्प उद्ध्वस्त केला आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. पाकिस्तानने भारताच्या अनेक महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे.

पाकिस्तान ज्या दहशतवादी बेस कॅम्पवरून भारतावर हल्ले करत होता. तेच बेस कॅम्प भारताने उडवून लावले आहेत. भारताने ही कारवाई कशाप्रकारे केली आहे त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पाकिस्तानने भारतावर फतेह 1 या मिसाईलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा हल्ला भारताने परतवून लावला. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानच्या हवाई तळांवर हल्ला केला आहे.

भारताची लढाऊ विमाने पाकिस्तानमध्ये घुसली आहेत. पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताने पाकिस्तानच्या तीन ते चार हवाई तळांवर हल्ले केले आहेत. भारताने रावळपिंडीजवळ असलेल्या नूर खान हवाई तळावर हल्ला केला आहे, असे म्हटले जात आहे. मुरीद आणि सुकुर या हवाई तळांवर देखील भारताने हल्ला केल्याचे म्हटले जात आहे.

भारताच्या या हल्ल्यात(attack) पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानचे तीन एअरबेस उडवले आहेत. त्यामुळए पाकिस्तानी एअरफोर्स या ठिकाणावरून उड्डाण करून शकणार नाही. पाकिस्तानचे या हल्ल्यात मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानकडून भारताचे हवाई तळ लक्ष्य करण्यात आले होते. मात्र भारताने हा हल्ला परतवून लावला.

हेही वाचा :

आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींसाठी देवी लक्ष्मी करणार धनवर्षा, धनलाभाचे संकेत

मोठी बातमी! भारतीय सैन्यदलाकडून जोरदार पलटवार; २८ दहशतवाद्यांचा केला खात्मा

अजितदादा-सुप्रिया सुळेंमध्ये पॅचअप? एकाच व्यासपीठावर आल्यानंतर काय झालं?