कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : .भारताची थेट युद्ध करण्याची कुवत नाही, म्हणून मग दहशतवादी संघटनांना हाताशी धरून, त्यांना सर्व प्रकारची रसद पुरवून भारतामध्ये हल्ले करायचे, मर्यादित युद्ध करायचे, अशी नीती पाकिस्तानची आहे. हिंदू विरुद्ध मुस्लिम दंगली च्या माध्यमातून भारतात सिव्हिल वॉर घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न यापूर्वी पाकिस्तानने केले आहेत पण त्यात सातत्याने अपयश येत राहिल्यानंतर आता थेट धर्म विचारून फक्त हिंदूंना ठार मारायचे(killing) अशी भ्याड नीती काश्मीरच्या पहलगाम मध्ये लष्कर ए तोयबाची पोट शाखा असलेल्या “कश्मीर रेजिस्टन्स” ने वापरली आहे. यापूर्वी म्हणजे गेल्या 25 वर्षात पर्यटकांच्यावर सहा हल्ले झाले आहेत. पण धर्म विचारून केलेला हा पहिला हल्ला आहे.

या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे हे लपून राहिलेले नाही. मुंबईवरील 26/ 11 चा हल्ला, काश्मीर मधील पुलवामा हल्ला आणि त्यानंतर झालेला पहलगाम पर्यटकांवरील हल्ला. हे तीन सर्वात मोठे दहशतवादी हल्ले समजले जातात. पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा दुर्दैवी बळी गेला आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक, गुजरात येथील 30 पेक्षा अधिक पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला असल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याचा तात्काळ बदला घेण्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. या हल्ल्याची अतिशय गांभीर्याने केंद्र शासनाने दखल घेतली असल्यामुळे नजीकच्या काही दिवसात भारताकडून मोठी कारवाई अपेक्षित आहे.
पाकिस्तान हा पूर्णपणे कंगाल झालेला देश आहे. चीन वगळता अन्य कोणताही देश त्याला अर्थसहाय्य करायला तयार नाही. तेथील सर्वसामान्य जनतेला जगायचे कसे हा प्रश्न पडलेला आहे. त्यातच बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करून टाक लष्करावर हल्ले (killing)सुरू केले आहेत. या गंभीर परिस्थितीवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधायचे असेल तर काश्मीरचा मुद्दा घेऊन भारतात अत्यदेखील हल्ले करायचे हे तंत्र तेथील राज्यकर्ते आणि लष्करांकडून नेहमीच वापरले जातात. आताही तेच तंत्र वापरले आहे.
मुंबईवरील 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्र तहवूर राणा याला अमेरिकेने भारताच्या ताब्यात देणे, भारतीय वखर कायद्यात सुधारणा करणे ही दोन कारणे ही तहेलगाम हल्ल्याच्या मागे आहेत. लष्कर ए तोयबा यासारख्या काही दहशतवादी संघटनांचे भारतातील काश्मीर सह काही मोठ्या शहरांमध्ये स्लीपर सेल आहेत. त्यांच्या मदतीशिवाय कोणताही हल्ला करता येत नाही. पहलागामामध्ये सुद्धा चार अतिरेक्यांपैकी एक जण स्थानिक असल्याचे वास्तव समोर आले आहे.
जम्मू काश्मीरचा उत्तर भाग आता शांत झाला आहे. तेथील पर्यटन व्यवसाय वाढला आहे. हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण तेथे आता मोठ्या प्रमाणावर होत आहे. 370 कलम हटवल्यानंतर तेथे परकीय आणि भारतीय गुंतवणूक वाढून रोजगार संधी वाढू लागल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी काश्मीरच्या श्रीनगर मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद झाली होती. या परिषदेला इस्लामी का राष्ट्रांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने आले होते. त्यामुळे काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे या इस्लामिक राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी श्रीनगर मध्ये येऊन अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे.

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या शांततापूर्ण वातावरणात नुकत्याच पार पडल्या आहेत. काश्मीरमधील फुटीरता वाद्यांची चळवळही मोडीत काढण्यात आली आहे. काश्मीरचे हे बदलते राजकारण आणि बदलते प्रवाह हे पाकिस्तानला पचनी पडणारे नाहीत. पाकिस्तानच्या जनतेला काश्मीर आता स्वतंत्र होऊ शकत नाही याची खात्री झाली आहे.
पण काश्मीर विषय अजेंडा वरून काढून टाकला तर पाकिस्तानवर पकड ठेवता येत नाही या पारंपरिक मानसिकतेतून पाकिस्तानकडून अशा प्रकारचे हल्ले दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून केले जाऊ लागले आहेत(killing). भारतामध्ये अराजक निर्माण करायचे असेल तर तिथे यादवी युद्ध झाले पाहिजे. म्हणूनच मग पर्यटकांना तुमचा धर्म कोणता असा प्रश्न विचारून फक्त हिंदूंना ठार मारायचे अशी भ्याडनिती पहलगाम हल्ल्यामध्ये वापरली गेली आहे. पण त्यांची ही नीती भारतामध्ये यशस्वी होणे खूपच कठीण आहे.
मुंबईवरील 26/ 11 चा हल्ला, नंतरचा पुलवामा हल्ला या दोन मोठ्या हल्ल्यानंतर पहलगाम येथे झालेला हा तिसरा मोठा हल्ला आहे. काश्मीरचा मुद्दा जागतिक मंचावर आणण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. पण संपूर्ण जगाने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
गेल्या 70 वर्षांपासून भारतापासून काश्मीर तोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण त्यात यश येत नाही हे माहीत असूनही पाकिस्तानमधील आपली सत्ता अधिक बळकट करण्यासाठी लष्कराच्या मदतीने पाकिस्तानचे राज्यकर्ते अशा प्रकारचे हल्ले करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी केलेले भाषण चिथावणीखोर होते. काश्मीर ही आमची गळ्यात जवळची नस आहे.
काश्मीरला स्वतंत्र करण्यापासून आम्हाला कोणीही अडवू शकत नाही अशी गरळ या मुनीर महाशयांनी ओळखली आहे. काश्मीरचे 370 वे कलम हटवलेले या मुनिरना पचनी पडलेले नाही. वक्फ कायद्यात केलेली सुधारणा त्यांना आवडलेली नाही. तहवरर राणा याला अमेरिकेने भारताच्या ताब्यात दिल्यामुळे ते संतप्त झालेले आहेत. आणि म्हणूनच अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात आले असतानाच पहलगाम येथे झालेला हा हल्ला(killing) म्हणजे अमेरिकेला अप्रत्यक्ष दिलेली धमकी आहे असे समजले जाते.
पहेलगाम म्हणजे दुसरे स्वित्झर्लंड मानले जाते.
तेथील सर्वसामान्य जनतेचा चरितार्थ हा पूर्णपणे पर्यटकांच्यावर अवलंबून आहे. आता तेथील एकूण पर्यटन व्यवसायावर अतिशय प्रतिकूल परिणाम होणार आहे. जगभरातील अनेक देशांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमचा देश भारताबरोबर आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. इस्लामिक देशांनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबिया येथील दौरा अर्धवट टाकून हे भारतात परतले आहेत.
नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गुप्तचर संघटनांचे प्रमुख, लष्करातील उच्च अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कठोर निर्णय घेतील किंवा त्यांनी ती घेतली पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. कठोर निर्णय घेण्यासाठी केंद्र शासनावर दबाव वाढतो आहे(killing). त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक पेक्षाही अधिक प्रभावी कारवाई नजीकच्या काळात होण्याची शक्यता आहे.
पहलगाम येथील पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्यावर कशा पद्धतीने हल्ले करण्यात आले किंवा धर्म विचार मांडण्यात आले त्याचे व्हिडिओ आता व्हायरल होऊ लागले आहेत. एक नवविवाहित तरुणी आपल्या पतीच्या अचेतन देहा जवळ विमनस्क स्थितीत बसलेली आहे असा एक व्हिडिओ मंगळवारपासून सतत दाखवला जातो आहे. हा फोटो पाहून संपूर्ण देश अक्षरशः सुन्न झालेला आहे.
पुणे, डोंबिवली, धाराशिव येथील सहा पर्यटकांचा पहेलगाम येथे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या हृदयात झालेली ही मोठी जखम आहे. महाराष्ट्रातील या सहाही जणांना तुमचा धर्म कोणता हा प्रश्न विचारून त्याचे उत्तर हिंदू असे आल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या आहेत. अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर, आता संपूर्ण देशाचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता कठोर निर्णय घेणार इकडे लागले आहे.
हेही वाचा :
सोनं झालं स्वस्त! २४ तासांत ३००० रुपयांनी घसरलं
Oppo च्या नव्या स्मार्टफोनची चीनमध्ये झाली एंट्री!
फोन जप्त केला म्हणून विद्यार्थीनीने शिक्षिकेलाच केली मारहाण, चप्पल काढली अन्… Video Viral