अखेर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे, नाशिकचे पालकमंत्री (ministership) म्हणून गिरीश महाजन यांचं नाव जाहीर झालं आहे. पालकमंत्रिपदाची घोषणा होताच गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

अखेर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांची नावं जाहीर झाली आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं आहे.(ministership) या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून गेल्या अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आदिती तटकरे या उत्सुक होत्या तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भरत गोगावले यांनी पालकमंत्रिपदावर दावा केला होता, अखेर रायगडचं पालकमंत्रिपद हे भरत गोगावले यांना मिळालं आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी देखील रस्सीखेच सुरू होती, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीकडून देखील दावा करण्यात आला होता. मात्र अखेर हा तिढा सोडवण्यात आता यश आलं आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर आता गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ते पुंढरपूरमध्ये बोलत होते.
पंढरपुरात आल्यानंतर देवाचे दर्शन करताना मला ही बातमी समजली. त्यामुळे मला पांडुरंग पावला आहे. आपण मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. नाशिक मध्ये खड्ड्यांसाठी काही लोक आंदोलन करत आहेत, मोर्चे काढत आहेत. नाशिकचे रस्ते सिमेंटचे करायचे आहेत. थोडा त्रास सहन करावा लागेल मात्र नाशिक स्वच्छ आणि सुंदर होईल. अगोदर कुंभमेळा मंत्री होतो. आता पालकमंत्री झालो असल्याची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात व्यक्त केले आहे. पंढरपुरात विठ्ठल दर्शन झाल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत महाजन यांनी आनंद व्यक्त केला आहे. (ministership) दरम्यान दुसरीकडे भरत गोगावले यांच्याकडून आधीच पालकमंत्रिपदाचे संकेत देण्यात आले होते. रायगडचे पालकमंत्री आपणच होणार असं त्यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं. अखेर आज त्यांचं भाकीत खरं ठरलं आहे. रायगडचे नवे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांचं नाव जाहीर झालं आहे. भरत गोगावले हे आज दिल्लीमध्ये आहेत.
हेही वाचा :
धीरज परदेशीची भगव्या टिळ्यामुळे हत्या का? संग्राम जगताप यांच्या मागण्या काय?
तुम्ही नालायक गृहमंत्री राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण अमित शहांवर संतापले?