लवकरच तुमच्या हातातही प्लास्टिकच्या नोटा दिसू शकतात. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नोटांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, सुरुवातीच्या टप्प्यात १० रुपये आणि २० रुपयांच्या नोटा पॉलीमर (प्लास्टिक) स्वरूपात जारी करण्याची योजना आहे. या बदलामुळे अनेक दशकांपासून सुरू असलेल्या कागदी नोटांच्या व्यवस्थेत मोठे परिवर्तन होणार आहे.

महागाईचे आव्हान सध्या आरबीआयकडून कागदी नोटांची छपाई केली जाते. मात्र, या नोटा लवकर फाटणे आणि खराब होणे ही मोठी समस्या आहे. (10 and 20 rupee) यावर उपाय म्हणून आरबीआय पॉलीमरपासून बनवलेल्या अधिक टिकाऊ नोटा आणण्याचा प्रयत्न करत आहे. प्लास्टिकच्या नोटा प्रत्यक्षात आणण्यासाठी आरबीआयने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भारतात नोटांची छपाई करणाऱ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड (BRBNMPL) ने देशात पॉलीमर सब्स्ट्रेट शीट्स तयार करण्यासाठी (EOI) जारी केला आहे.
पॉलीमर सब्स्ट्रेटवर छापलेल्या नोटा अधिक मजबूत आणि टिकाऊ असतात. त्या कागदी नोटांच्या तुलनेत बराच काळ वापरता येतात. तज्ज्ञ भागीदारांचा शोध सुरू १७ जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या EOI नुसार, सिक्युरिटी-ग्रेड पॉलीमर सब्स्ट्रेट तयार करण्यात तज्ज्ञ असलेल्या भागीदाराचा शोध घेतला जात आहे. ही एक विशेष प्रकारची प्लास्टिक शीट असते, (10 and 20 rupee) ज्यावर चलनी नोटांची छपाई केली जाते. BRBNMPLचा उद्देश केवळ हे साहित्य आयात करण्याचा नसून, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि सहकार्याच्या माध्यमातून भारतातच त्याचे उत्पादन सुरू करण्याचा आहे. सध्या अशा कंपन्यांची निवड केली जात आहे, ज्या भारतात पॉलीमर नोटांचे उत्पादन सुरू करण्यासाठी तांत्रिक मदत करू शकतील.
महत्त्वाचे म्हणजे, EOI म्हणजे खरेदीचा आदेश नाही. व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यापूर्वी योग्य तंत्रज्ञान आणि सक्षम भागीदार शोधण्याची ही प्राथमिक प्रक्रिया आहे. प्लस्टिकच्या नोटा का आवश्यक? कागदी नोटांच्या तुलनेत प्लास्टिकच्या नोटा अधिक काळ टिकतात. पाणी, ओलावा आणि धुळीचा त्यांच्यावर कमी परिणाम होतो. त्या सहज फाटत नाहीत आणि अधिक स्वच्छ राहतात. (10 and 20 rupee) त्यामुळे वरंवार नवीन नोटा छापण्याची गरज कमी होते. सध्या जगातील ६० हून अधिक देशांनी पॉलीमर (प्लास्टिक) नोटांचा स्वीकार केला आहे.
हेही वाचा :
शिरढोणमध्ये स्मार्ट मीटरवरून महावितरणचे अधिकारी धारेवर?
12वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी UIDAI मध्ये पदांची भरती सुरु?