तारतम्य भाव नसलेले काही बालिश राजकारणी

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पहेलगाम दहशतकांडानंतर निष्पाप पर्यटक दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाल्यानंतर, भारत आणि पाक मध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय(politicians) नेत्यांनी त्यावर भाष्य करताना किमान तारतम्य ठेवले पाहिजे पण त्याचे भान नसलेले काही जण पाककडून त्याचे भांडवल केले जाईल अशी वक्तव्ये करू लागले आहेत.

अतिशय संवेदनशील विषयावर बालिश वक्तव्य करणाऱ्या या मंडळींचा सर्वांनीच निषेध केला पाहिजे(politicians). ज्येष्ठ नेते शरद पवार, वंचित चे नेते प्रकाश आंबेडकर, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, धर्मगुरू अविमुक्तेश्वर शंकराचार्य, विजय वडेट्टीवार, अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे, फुटकळ भूमिका करणारा अभिनेता किरण माने, यांनी पहेलगाम दहशतकांडावर केलेली विधाने बालिशपणाचे दर्शन घडवणारी आहेत.

कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणतात पाकिस्तानशी युद्ध नको, तो काही अंतिम पर्याय होऊ शकत नाही. त्यांच्या या वक्तव्याची दखल पाकिस्तान मधील वृत्तपत्रांनी ठळकपणे घेतली आहे. दहशतवाद्यांना, त्यांच्या सूत्रधारांना कशाप्रकारे धडा शिकवावा याचे मार्गदर्शन सिद्धरामय्या यांनी करायला हवे.

नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान शहाबाज शरीफ यांना”तुमच्या त्या अतिरेक्यांना जरा सबुरीने घ्यायला सांगा”अशी विनंती करावी काय? भ्रष्टाचारी मार्गाने पत्नीच्या नावे घेतलेल्या जमिनी, न्यायालयाने डोळे वटारताच, लोकायुक्तांनी कारवाईचा बडगा उगारतात घेतलेल्या शासकीय जमिनी पुन्हा शासनाला परत देण्या इतकं त्यांना पहलगाम प्रकरण सहज आणि सोपं वाटतं काय?

काँग्रेसचे(politicians) महाराष्ट्राचे नेते विजय वडेट्टीवार हे तर अजब रसायन आहे. व्यक्त व्हायला त्यांना कोणताही विषय चालतो. पाकिस्तानच्या वतीनेही ते व्यक्त होऊ शकतील. पहलगाम येथील पर्यटकांवर गोळ्या झाडताना तुमचा धर्म कोणता हा प्रश्न विचारायला त्यांच्याकडे म्हणजे दहशतवाद्यांकडे वेळ तरी होता काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील जे सहा पर्यटक मारले गेले, त्यांच्या नातेवाईकांना या वडेट्टीवार महाशयांनी धादांत खोटे ठरवले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पहेलगाम विषयावर काँग्रेसच्या कुणीही वादग्रस्त वक्तव्य करू नये अशा सूचना दिल्या आहेत पण तरीही दहशतवाद्यांची, पाकिस्तानची सुपारी घेतल्यासारखे त्यांचे राज्यस्तरीय नेते बोलताना दिसतात.

अभी मुक्तेश्वर नामक शंकराचार्यांना तर पहलगाम दहशतकांड झाल्यानंतर अवघ्या तीन मिनिटात भारताला कसे समजले की या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे? असा गंभीर प्रश्न पडला. नशीब, त्यांनी काश्मीरला पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रत्येक हिंदूला कलमा पठण करता आला पाहिजे असे सांगितले नाही. पर्यटक मारले गेले याचं त्यांना दुःख नाही तर त्याचा ठपका पाक वर ठेवल्याबद्दल त्यांना दुःख झालेले दिसते. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या बद्दल या हिंदू धर्मगुरूंना
दुःख झाल्याचे दिसत नाही.

सिंधू पाणी वाटप करार आम्ही स्थित करत आहोत म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी पाणी तोडणार असा त्याचा अर्थ होत नाही. पाणीपट्टी भरली नाही म्हणून पाणीपुरवठा खंडित करण्याइतके ते सहज आणि सोपे नाही हे प्रत्येक भारतीयाला माहित आहे. पण वंचित चे नेते प्रकाश आंबेडकर यांना ते माहीत नाही असे दिसते. घोषणा करूनही नरेंद्र मोदी(politicians) यांनी पाकिस्तानचे पाणी तोडलेले नाही, ते देशवासीयांची दिशाभूल करतात असे ते जाहीरपणे सांगत सुटले आहेत. अपरिपक्व राजकारणी कसा असू शकतो हे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.

डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पहलगाम दहशतकांडावर भाष्य करताना, शहीद झालेल्या पर्यटकांचा, त्यांच्या नातलगांचा घोर अपमान केला आहे.”जात नाही, धर्म विचारला”या एका वाक्याने देशाचे जेवढे नुकसान झाले तेवढे नुकसान अतिरेक्यांनीही केलेले नाही”असे संतापजनक वक्तव्य त्यांनी केलेले आहे.

दुसऱ्यांनी लिहिलेली वाक्ये, पाठांतर करून कॅमेऱ्यासमोर बोलायची त्यांना सवय असल्यामुळे स्वतःची वाक्ये बोलताना त्यांची जीभ घसरलेली दिसते. आणखी कुणीतरी एक फुटकळ अभिनेते आहेत. किरण माने असे त्यांचे नाव आहे. या महाशयांनी दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या निष्पाप, निशस्त्र पर्यटकांची तुलना बदलापूरच्या अक्षय शिंदे या विकृताशी करताना अकलेचे तारे तोडले आहेत.

दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या वर केलेला गोळीबार आणि अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करताना पोलिसांनी केलेला गोळीबार या महाशयांनी एकाच पातळीवर आणला आहे(politicians). काश्मीर खोऱ्यात यापूर्वी दहशतवाद्यांनी अनेक हल्ले केले आहेत. पण दिनांक 22 एप्रिल रोजी पहेलगाम येथे पर्यटकांच्यावर त्यांचा धर्म विचारून केलेला हल्ला हा काश्मिरी जनतेच्या जिव्हारी लागला आहे. काश्मीर खोऱ्यात पहिल्यांदाच संतापाची लाट उसळली आहे.

काश्मीर विधानसभेत या हल्ल्याची कठोर शब्दात निर्भत्सना करण्यात आली आहे. हे पहिल्यांदाच घडते आहे. काश्मीर बदलत आहे याचे ते प्रत्यंतर आहे. काश्मीरची जनता दहशतवाद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरत असताना उर्वरित देशातील काही नेते मात्र पाकिस्तानला भांडवल करता येईल अशी वक्तव्ये करीत सुटले आहेत. युद्धाची भाषा नको, पाकिस्तानी नागरिकांची पाकिस्तानला परत पाठवणी नको, मानवतावादी दृष्टिकोन पाहिजे, युद्ध हा पर्याय नाही असे फुकाचे सल्ले काहीजण देऊ लागले आहेत. पहलगाम येथे पर्यटकांच्या वर झालेला हल्ला हा देशावर झालेला हल्ला आहे असे या मंडळींना वाटत नाही हेच या देशाचे दुर्दैव आहे.

हेही वाचा :

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींवर बरसणार पैशांचा पाऊस

मॅचनंतर कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या लगावली कानशिलात Video Viral

महागडे सनस्क्रीन वापरण्यापेक्षा खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ गुणकारी पदार्थ