मद्यपींसाठी मोठी बातमी आहे. वाईनपासून ते अनेक ड्रिंक्स महागण्याची शक्यता आहे. कारण ते तयार करण्यासाठी साखर वापरली जाते. साखरेचे भाव शंभरी गाठण्याची भीती आहे. (drinks) त्याचा परिणाम दारू उद्योगावर होण्याची शक्यता आहे.

भारतीय बाजारात गेल्या काही आठवड्यात साखरेच्या किरकोळ किमती दणादण वाढल्या. साखर 70 रुपयांच्या घरात आहे. ती लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साखर महागल्याचा परिणाम लागलीच चहा, मिठाई आणि कोल्ड ड्रिंक उत्पादनावर झाला आहे. चहा महागला आहे. मिठाई महागल्या आहेत. कोल्ड ड्रिंक आणि आता दारुच्या किमतीतही मोठा फरक दिसण्याची शक्यता आहे. प्रत्येक दारूत साखर टाकली जात नाही. पण काही ड्रिंक्समध्ये साखरेचा वारेमाप वापर होतो. आता मद्यही महागण्याची शक्यता आहे.
लिकुअर ड्रिंक मद्यप्रेमी आवडीने पितात. यामध्ये साखरेचा वापर होतो. हे एक फ्लेवर्ड ड्रिंक असते. कॉकटेल अथवा डेजर्टसोबत ते पिल्या जाते. त्यासाठी कमीत कमी 100 ग्रॅम प्रति लिटर साखरेचा वापर करण्यात येतो. (drinks) अनेक नावाजलेल्या लिकुअर ब्रँडमध्ये हे प्रमाण 180 ते 350 ग्रॅम प्रति लिटरपर्यंत पोहचते. कारण त्यात इतर दारुपेक्षा अतिरिक्त साखर असते. बाजारात फ्लेवर्ड वोडका आणि फ्लेवर्ड रममध्ये थोड्या प्रमाणात साखर मिसळली जाते. मूळ वोडका आणि रममध्ये थोड्याप्रमाणात साखर मिसळली जाते.
साखर महागल्याने दारूची किमत वाढले का? देशातील अनेक देशी आणि इंग्रजी दारू ही ऊस आणि मळीपासून तयार करण्यात येते. मळीचा वापर केल्याने दारूची किंमत वाढणार नाही. साखर तयार करण्यासाठी मोठी प्रक्रिया राबवली जाते. साखर थेट वापरली जात नसल्याने दारू महागणार नाही. पण ज्या पेयांमध्ये, दारूमध्ये रिफाईंड साखरचा थेट वापर होतो. त्याच्या किंमतीवर मोठा परिणाम होतो. राज्य सरकारचा टॅक्स आणि एक्साईज ड्युटीचा भार असतो. केवळ साखर किमत वाढल्याने दारुच्या किमतीत वाढ होईल असे नाही. कंपन्यांनी सुद्धा दारू दरवाढीविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
सुट्या बाजारात साखर आणि खाद्यतेल या आवश्यक पदार्थांमध्ये दरवाढ झाली आहे. स्वयंपाकगृहाचे बजेट कोलमडले आहे. यापूर्वीच डाळी, कडधान्ये, भाजीपाला, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाली आहे. (drinks) सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. साखरेचा दर अचानक 75 रुपये किलोच्या घरात गेल्याने ग्राहकांत नाराजी पसरली आहे. सुट्या तेलावरूनही खडाजंगी सुरू आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहे. पुढील तीन महिन्यात जनतेची कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा :
कोल्हापुरातील हातकणंगले धुळोबा रामलिंग देवस्थानाकडे जाणारा रस्ता रात्रीतून जेसीबीने उकरला?
लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची मोठी भेट, ४८ तासांत खात्यात जमा होणार ३००० रुपये?